शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील ज्येष्ठांनी केला नर्मदा परीक्रमा…

एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील तीन ज्येष्ठ व्यक्तींनी एकत्र येत संस्कृतीचा भाग म्हणून नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करुन एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास करत इतिहास रचला असल्याने शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने सदर ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बाळासाहेब नामदेव भुजबळ तसेच पाबळ येथील एकनाथ शंकर आगरकर व आण्णा नारायण झोडगे या तिघांनी एकत्र येत नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करत ५ नोव्हेंबर २०२२ रोजी ओंकारेश्वर येथून नर्मदा नदीचे दर्शन घेत त्यांच्या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली त्यांनतर त्यांनी नदीचे कडेने पायी आपला प्रवास सुरु करत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड असा प्रवास करत काही भाग समुद्री मार्गाने जाऊन तब्बल 109 दिवसात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी 3 हजार 500 किलोमीटर प्रवास करुन इतिहास रचत त्यांचा नर्मदा परिक्रमा पूर्ण केला.

ते आपल्या मायभूमी परतताच शिक्रापूरहे सरपंच रमेश गडदे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ, माजी सरपंच चंद्रकला भुजबळ, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे, बाळासाहेब मांढरे यांच्या हस्ते बाळासाहेब भुजबळ, एकनाथ आगरकर व आण्णा झोडगे यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिकांनी केलेला 3 हजार 500 किलोमीटरचा पायी प्रवास व त्यांचा नर्मदा परिक्रमा हा युवकांना प्रेरणा देणार असल्याचे मत सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केले यावेळी सोमनाथ भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 मिनिटे ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

1 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

18 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

22 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

22 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

22 तास ago