शिरूर तालुका

सौर पंप एजन्सींकडून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक!

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” अंतर्गत शेतकऱ्यांना वीजटंचाईवर उपाय म्हणून कमी खर्चात सौर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवले असले, तरी प्रत्यक्षात या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा भ्रष्टाचार आणि पिळवणुकीचे प्रकार शिरूर तालुक्यात समोर येत आहेत. योजना लाभार्थ्यांसाठी असली तरी, ती काही ठराविक एजन्सी आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या एजंटांच्या फायद्याची ‘संधी’ ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

योजनेनुसार शेतकऱ्यांनी फक्त ५ टक्के रक्कम भरायची असून उर्वरित ९५ टक्के रक्कम शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाते. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून सौर पंप बसवण्यासाठी वेगवेगळ्या बहाण्यांनी अतिरिक्त खर्च आकारले जात आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

सौर साहित्य स्वतःच्या वाहनातून घेऊन जायला लावणे,खड्डे खोदणे, सिमेंट, वाळू, खडी स्वतः खरेदी करायला भाग पाडणे,पंप बसवण्यासाठी एक ते दोन हजार रुपये ‘अधिक’ घेणे,सौर पंप बिघडल्यास देखभाल-दुरुस्तीसाठी कोणतीही मदत न देणे,गॅरंटी कार्ड न देणे किंवा खराब साहित्य बसवणे यामुळे शेतकरी बेजार झाले असून अशा बोगस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे

महादू मुसळे, म्हसे येथील जेष्ठ नागरिक, सांगतात, मी पैसे भरले असूनही साहित्य स्वतः फाकटेहून आणायला सांगण्यात आले. काम सुरू करायलाही कोणी येत नाही. महिनाभर झाला तरी अजून सौर पंप कार्यान्वित झाला नाही.

मनिषा बारहाते, टाकळी हाजी येथील शेतकरी महिला म्हणतात की, रोटोमॅग कंपनीने सौर प्लेट खराब दिली. सहा महिने झाले तरी बदल दिला नाही. फोन घेत नाहीत. गॅरंटी कार्डही नाही. आमची सरळ फसवणूक चालू आहे.

राजेंद्र गावडे, माजी संचालक, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती, यांनी तीव्र शब्दांत याबाबत संताप व्यक्त केला आहे .एजन्सी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत. ही कामे त्यांची जबाबदारी असूनही ती शेतकऱ्यांकडून करून घेत आहेत. यांच्यावर कारवाई करून थेट ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे.” अशी मागणी त्यांनी केली आहे

याबाबत शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी स्पष्ट केले की, सौर पंप मंजूर झाल्यानंतर साहित्य वाहतूक, खड्डे खोदणे, सिमेंट इत्यादी जबाबदारी एजन्सीचीच आहे. शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्यास ते चुकीचे असून, काही एजन्सीविरोधात तक्रारी आल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांचे आरोप असेही आहेत की, महावितरणमधील काही अधिकारी या एजन्सींच्या बिले परस्पर पास करून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना न्यायासाठी कुठेही दाद मागता येत नाही, ही खेदजनक स्थिती निर्माण झाली आहे.या योजनेचे नियंत्रण MEDA व MSEDCLकडे असूनही एजन्सींच्या बेकायदेशीर वर्तनावर अंकुश नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. शासनाने यावर त्वरित दखल घेऊन दोषी एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे व आर्थिक दंड ठोठावणे अत्यावश्यक आहे.

हे प्रकरण केवळ एका गावापुरते मर्यादित नाही. हे संपूर्ण राज्यभरातील योजना अंमलबजावणीतील एक नमुना आहे. शासनाने जर वेळेत कारवाई केली नाही, तर शेतकरी संघटना आणि सामान्य शेतकरी एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडू शकतात.

तुमचाही अनुभव असाच असेल तर गप्प बसू नका!

महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधा आणि लेखी तक्रार नोंदवा. तुमच्या आवाजामुळे आणखी एखाद्या शेतकऱ्याची फसवणूक टळू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरूडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…

1 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

2 दिवस ago