शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे जमीन वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. 260/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना 18 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष बाळकृष्ण इचके (वय 40, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या गट क्र. 104 या जमिनीच्या शेजारी आरोपी कांद्याची आरण (चाळ) बांधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा संतोष इचके व त्यांचे कुटुंबीय – भाऊ राजेंद्र, भावजय सुरेखा, आई मंगल आणि पत्नी रूपाली – यांनी बांधकाम थांबवण्यास सांगितले असता, आरोपींनी चिडून जाऊन मारहाण केली, शिवीगाळ केली व दमदाटी केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपींविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार वारे हे करत आहेत.
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…