शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई (इचकेवाडी) येथे जमीन वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके आणि इतर पाच नातेवाईकांविरोधात गु.र.नं. 260/2025 अन्वये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना 18 एप्रिल रोजी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष बाळकृष्ण इचके (वय 40, रा. कवठे येमाई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या गट क्र. 104 या जमिनीच्या शेजारी आरोपी कांद्याची आरण (चाळ) बांधण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा संतोष इचके व त्यांचे कुटुंबीय – भाऊ राजेंद्र, भावजय सुरेखा, आई मंगल आणि पत्नी रूपाली – यांनी बांधकाम थांबवण्यास सांगितले असता, आरोपींनी चिडून जाऊन मारहाण केली, शिवीगाळ केली व दमदाटी केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपींविरोधात शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास टाकळी हाजी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार वारे हे करत आहेत.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…