शिरूर तालुका

शिरूर शहरापासून कोंढणओढ्या पर्यंत शेकडो खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहराच्या हद्दीपासून कोंढण ओढ्या पर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे. शेकडो खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रंचड हाल होत असून, काही ठिकाणी रस्ता फाटला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी मात्र या सर्व परिस्थितीकडे डोळे झाक करून निद्रिस्त अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर सहाय्यक अभियंता, हे कार्यालयात भेटतच नसून ते कायम तालुक्याबाहेरच असतात.त्यामुळे त्यांचे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना हे रस्ते दिसत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी अनेक वेळा या रस्त्यावरील खड्ड्यांविषयी लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही अद्याप पर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलट दिवसेंदिवस रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला असून, अपघातांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

त्यातच अनेक ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) न बसवल्याने दोन चाकी वाहनचालक आणि शालेय बसचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा उद्रेक वाढत असून, “करोडो रुपयांचा निधी कुठे जातो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

“दररोज या रस्त्यावरून तालुक्याच्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी, कामगार, शेतकरी, नागरीक आपल्या विविध कामांसाठी प्रवास करतात. पण रस्ता खड्ड्यांनी भरल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. जर तातडीने दुरुस्ती केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” अशी चेतावणी नागरिकांनी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे शिरूर-कोंढण ओढा मार्ग ‘खड्ड्यांचा महामार्ग’ बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्य नागरिकांची जोरदार मागणी आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

13 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

20 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

20 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

20 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

20 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

20 तास ago