panchayat samit shirur
सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी अपंग बांधवांच्या यशवंत घरकुल योजनेची वाट लावली असून पंचायत समितीमध्ये विविध प्रस्ताव अनेक महीन्यांपासून आर्थिक लालसेपोटी धुळ खात पडून असल्याचे प्रहार दिव्याग क्रांती संस्थेचे कार्यकर्ते दत्तात्रय तरटे यांनी सांगितले.
दिव्यांग व इतर लाभार्थी वारंवार हेलपाटे मारत असून मुजोर आधिकारी यांनी गेल्या ७ ते ८ महीन्यापासून पुणे जिल्हा परिषदेकडे न पाठवता शिरुर पंचायत समितीमध्येच धुळ खात ठेवले आहे. यामुळे अपंग बांधव आक्रमक झाले असून ते पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे उपोषणाच्या तयारीत आहे..
शिरुर तालुक्यातील सर्व सामान्य लोक व शेतकरी यांची कामे पंचायत समिती मधील काही जबाबदार आधिकारी जाणीवपुर्वक प्रलंबीत ठेवत असून नाकरीकांची हेळसांड करत आहे, त्या नाकरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे,सरकारी योजना, तक्रारी अर्ज यांची दखल वेळत होत नसेल तर प्रशासनाने असे आधीकारी का पोसायचे,शिरुर पंचायत समिती हे ठिकाण चकरा मारण्याचा अड्डा झालाय असे मत शिवसेना शेतकरी तालुकाप्रमुख श्री योगेशभाऊ ओव्हाळ पाटील यांनी शिरुर तालुका डाॅट काॅम बोलताना सांगीतले.
सदर जबाबदार अधीकार्यांच्या विरोधात लवकरच मोठे आंदोलन करणार असल्याचे योगेश ओव्हाळ यांनी सांगितले. आता जिल्हा परीषदेचे सीईओ या कामचुकारांवर काय कारवाई करतात याकडे दिव्यांग बांधवाचे लक्ष लागले असून आमदार अशोक बापू पवार याबाबत काय भुमिका घेतात याकडे शिरुर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…