शिरूर तालुका

खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ पाटी; शिरूरचे भूमिअभिलेख उपअधीक्षक चर्चेत

शिरूर पोलिसांनी कारवाई करत फाडले चलन 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले उपअधीक्षक अमोल भोसले हे खासगी वाहनावर “महाराष्ट्र शासन” अशी शासकीय पाटी लावून फिरत असल्याचे उघड झाल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनचे ट्राफिक हवालदार राजेंद्र वाघमोडे व शेखर झाडबुके यांनी तातडीने फोटो काढत चलन काढले आहे आहे. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनात आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर वाहन खासगी असूनही त्यावर शासकीय वाहन असल्याचा आभास निर्माण करणारी पाटी लावण्यात आली आहे. यामुळे कायद्यानुसार तीव्र आक्षेप घेतला जात आहे. शासन नियमावलीनुसार केवळ शासनाच्या नावे नोंदणीकृत वाहनांवरच अशा स्वरूपाची पाटी लावण्यास परवानगी आहे. मात्र खासगी वाहनावर अशी पाटी लावल्यास तो फसवणूक, दिशाभूल आणि शासकीय अधिकाराचा गैरवापर मानला जातो.

या प्रकरणी जागरूक नागरिकांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे अधिकृत लेखी तक्रार सादर करणार असल्याचे सांगितले आहे.संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारकर्त्यांनी पुरावेही सादर करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकारामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे ठरत आहे. अशा प्रकारे कायद्याचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी निलेश वाळुंज या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

(क्रमश:)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

6 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

7 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

7 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

7 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

8 तास ago