शिरूर तालुका

सरदवाडी येथे शिवपानंद रस्त्या संदर्भात बैठक संपन्न

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित साधून सरदवाडी येथे शिवपानंद पूर्वापार शेतवहिवाटीचा रस्त्या संदर्भात सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लक्ष्मीताई बाळासाहेब जाधव यांनी बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्या बैठकीला मा महाराष्ट्र राज्य शेत पानंद रस्ते चळवळीचे प्रणेते शरद भाऊ पवळे यांनी मार्गदर्शन केले. शिवपानंद रस्ते ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असून शेवटच्या बांधापर्यंत जोपर्यंत शेतकऱ्यांना रस्ता मिळत नाही तोपर्यंत चळवळ शांत बसणार नाही असे पवळे यांनी सांगितले. तसेच ऍड. सुप्रिया साकोरे यांनी कायदेशीर मार्गदर्शन केले. विजय शेलार यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व रस्त्याचे महत्त्व पटवून दिले.

सरदवाडी हे गाव रोड मॉडेल व्हिलेज म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच लक्ष्मी जाधव यांनी सांगितले.

तसेच रोड मॉडेल व्हिलेज कमिटी स्थापन करण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी शिरूर पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे शरद भाऊ पवळे, विजय शेलार, ऍड. सुप्रिया साकोरे, सुरेश वाळके, बापूराव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिरामण सरोदे, उपाध्यक्ष कैलास सरोदे,उपसरपंच सोमनाथ सरोदे, ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे,शिल्पा घावटे,विद्या सरोदे, सुरेखा निरवणे, मोनाली कर्डिले ग्रामस्तरीय कमिटीचे पंकज शेळके, विकास सोसायटीचे संचालक किशोर सरोदे, शिरूर मंडलाधिकारी फलके साहेब, तलाठी चौधरी मॅडम, माजी सरपंच कमलताई सरोदे, हनुमान सरोदे आदी ग्रामस्थ तसेच महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरदवाडी गावचे ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी केले तर आभार सरपंच लक्ष्मीबाई बाळासाहेब जाधव यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

57 मिनिटे ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

60 मिनिटे ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

1 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

1 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

1 तास ago