शिरूर तालुका

मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

मैदानी खेळ नसल्याने मुलांच्या शारीरिक वाढीत अडचणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाईल झाला, तर मोबाईल मानवी जीवनातील एक आवश्यक घटक बनला आहे. मात्र युवक वर्ग व लहान लहान मुले मोबाईलमध्ये गुंतली गेल्यामुळे मुलांचे सुट्ट्यांच्या काळातील सर्व जुने मैदानी खेळ कालबाह्य होत चालले असून पुढील काळातील मुलांना खेळ म्हणजे काय हे सांगावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

शालेय जीवनात मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर आता आपल्याला भरपूर खेळ खेळता येणार या आनंदाने मुले बागडत असत शाळेला सुट्ट्या लागताच अनेक ठिकाणी मुले क्रिकेट, विट्टीदांडू, गोट्या, लिंगोरचा, आपारापी, लपाछपी, सूरपारंब्या, कब्बडी, खो खो, झोके, पतंग उडविणे, भिंगरी खेळणे यांसह आदी प्रकारचे पारंपारिक प्रकारचे खेळ खेळत तसेच दुपारच्या सुमारास पोहण्याचा आनंद घेत असत तर प्रत्येक ठिकाणी लहान लहान मुले कोणत्याही प्रकारचे खेळ खेळताना दिसून येत होते. त्यावेळी मुलांना खेळण्याच्या गडबडीमध्ये दिवसभराचा वेळ देखील कमी पडत होता आणि खेळांमुळे भूक देखील जास्त लागल्याने मुले वेळेवर पोटभर जेवण करत असत आणि मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये शारीरिक व्यायाम आपोआप घडत असल्याने मुले देखील शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहत होते.

तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले रानामध्ये जाऊन कच्च्या कैऱ्या, चिंचा गोळा करून आणण्याकडे देखील आकर्षित होत होते त्यामुळे मुलांना देखील झाडांना कधी कैऱ्या लागतील असे वेध लागलेले होते. परंतु सध्याच्या मोबाईलच्या काळामध्ये सर्व मुले मोबाईल मधील विविध प्रकारच्या गेम मध्ये रमून गेलेली असल्यामुळे कोठेही मुले कोणते खेळ खेळताना दिसून येत नाहीत सर्वत्र मैदाने मोकळी पडलेली आहेत, झाडांवरील कैऱ्या, चिंचा देखील झाडांवर राहिलेल्या आहेत. मुले घरातच मोबाईल मध्ये गेम खेळताना दिसून येत आहेत.

सध्याच्या मुलांना जुन्या खेळांबाबत कोणतीही माहिती नसून सर्व खेळ मुलांना समजावून सांगावे लागत आहेत त्यामुळे पुढील काळामध्ये मुलांना हे खेळ समजू शकतील का असा प्रश्न निर्माण झाला असून जुने सर्व मैदानी खेळ हे कालबाह्य होत चाललेले असल्याचे दिसून यते आहे.

मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता; प्रकाश घोलप (क्रीडा प्रशिक्षक)

लहान मुलांसाठी मोबाईलवर असलेल्या गेम मुले मुलांचा बौद्धिक विकास होतो परंतु शारीरिक विकास होत नाही व मुले कमजोर होतात, मात्र विविध मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक विकास होऊन मुले तंदुरुस्त राहतात त्याचा पुढील काळामध्ये शरीरासाठी उपयोग होतो त्यामुळे मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता असल्याचे मत क्रीडा प्रशिक्षक प्रकाश घोलप यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

11 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

12 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

14 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

16 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

16 तास ago