शिरूर तालुका

मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

मैदानी खेळ नसल्याने मुलांच्या शारीरिक वाढीत अडचणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाईल झाला, तर मोबाईल मानवी जीवनातील एक आवश्यक घटक बनला आहे. मात्र युवक वर्ग व लहान लहान मुले मोबाईलमध्ये गुंतली गेल्यामुळे मुलांचे सुट्ट्यांच्या काळातील सर्व जुने मैदानी खेळ कालबाह्य होत चालले असून पुढील काळातील मुलांना खेळ म्हणजे काय हे सांगावे लागणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

शालेय जीवनात मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर आता आपल्याला भरपूर खेळ खेळता येणार या आनंदाने मुले बागडत असत शाळेला सुट्ट्या लागताच अनेक ठिकाणी मुले क्रिकेट, विट्टीदांडू, गोट्या, लिंगोरचा, आपारापी, लपाछपी, सूरपारंब्या, कब्बडी, खो खो, झोके, पतंग उडविणे, भिंगरी खेळणे यांसह आदी प्रकारचे पारंपारिक प्रकारचे खेळ खेळत तसेच दुपारच्या सुमारास पोहण्याचा आनंद घेत असत तर प्रत्येक ठिकाणी लहान लहान मुले कोणत्याही प्रकारचे खेळ खेळताना दिसून येत होते. त्यावेळी मुलांना खेळण्याच्या गडबडीमध्ये दिवसभराचा वेळ देखील कमी पडत होता आणि खेळांमुळे भूक देखील जास्त लागल्याने मुले वेळेवर पोटभर जेवण करत असत आणि मैदानी खेळांमुळे मुलांमध्ये शारीरिक व्यायाम आपोआप घडत असल्याने मुले देखील शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहत होते.

तसेच उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुले रानामध्ये जाऊन कच्च्या कैऱ्या, चिंचा गोळा करून आणण्याकडे देखील आकर्षित होत होते त्यामुळे मुलांना देखील झाडांना कधी कैऱ्या लागतील असे वेध लागलेले होते. परंतु सध्याच्या मोबाईलच्या काळामध्ये सर्व मुले मोबाईल मधील विविध प्रकारच्या गेम मध्ये रमून गेलेली असल्यामुळे कोठेही मुले कोणते खेळ खेळताना दिसून येत नाहीत सर्वत्र मैदाने मोकळी पडलेली आहेत, झाडांवरील कैऱ्या, चिंचा देखील झाडांवर राहिलेल्या आहेत. मुले घरातच मोबाईल मध्ये गेम खेळताना दिसून येत आहेत.

सध्याच्या मुलांना जुन्या खेळांबाबत कोणतीही माहिती नसून सर्व खेळ मुलांना समजावून सांगावे लागत आहेत त्यामुळे पुढील काळामध्ये मुलांना हे खेळ समजू शकतील का असा प्रश्न निर्माण झाला असून जुने सर्व मैदानी खेळ हे कालबाह्य होत चाललेले असल्याचे दिसून यते आहे.

मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता; प्रकाश घोलप (क्रीडा प्रशिक्षक)

लहान मुलांसाठी मोबाईलवर असलेल्या गेम मुले मुलांचा बौद्धिक विकास होतो परंतु शारीरिक विकास होत नाही व मुले कमजोर होतात, मात्र विविध मैदानी खेळांमुळे मुलांचा शारीरिक विकास होऊन मुले तंदुरुस्त राहतात त्याचा पुढील काळामध्ये शरीरासाठी उपयोग होतो त्यामुळे मुलांना मैदानी खेळांची आवश्यकता असल्याचे मत क्रीडा प्रशिक्षक प्रकाश घोलप यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 दिवस ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

1 दिवस ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

2 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

2 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

2 दिवस ago