शिरुर (किरण पिंगळे-शेलार) आपले आरोग्य खूप महत्वाचे आहे. यासाठी ते जपले पाहिजे तुम्ही सर्व महिलांनी मिस्री,तंबाखू यासारखे व्यसन सोडले तर हा मकरसंक्रांतीचा दिवस सार्थक ठरला असे आम्हाला वाटेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले. रामलिंग येथील भिल्ल वस्ती येथे तेथील महिलांसोबत मकरसंक्रांत साजरी करण्यात आली. यावेळी स्त्रियांनी संकुचित भावना, मासिक पाळी विषयी अंधश्रद्धा दुर व्हावी म्हणून त्यांना संस्थेच्या वतीने सॅनिटरी पॅड व जीवनावश्यक वस्तू वान म्हणून देण्यात आल्या.
रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवत असते. वीट भट्टीवर काम करणाऱ्या महिलांना एक वेळ खाण्याची भ्रांत असते. तसेच त्यांना काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे असे सण साजरे करण्यासाठी त्यांना वेळ नसतो. त्यामुळे रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या महिलांनी तिथे जाऊन त्यांच्यासोबत हा सण साजरा केला. यावेळी हळदीकुंकू लाऊन, तिळगूळ देत व्यसन सोडा असा संदेश देण्यात आला.
यावेळी साधना सखी मंचच्या अध्यक्षा साधना शितोळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे, यशस्विनी वेलफेअर फाऊंडेशन नम्रता गवारे, राणी शिंदे, छाया हारदे, डॉ स्मिता कवाद, गीताराणी आढाव, जयश्री थेऊरकर, सोनल जोशी, तृप्ती जोशी,गायत्री देव्हाडे आदी महिला उपस्थित होत्या. या सर्वांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
संक्रातीचा ओवसा वाया घालवु नका:- राणी कर्डीले
मकरसंक्रात हा सर्व ठिकाणी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. मकरसंक्रात साजरा सण साजरा करावा पण महिला एकमेकांना ओवसताना,त्यात बोर, ऊस, हुरडा, गव्हाची ओंबी यासारख्या अनेक उपयोगी वस्तू त्यात असतात. या विनाकारण वाया जातात. यातून काहीच साध्य होत नाही मिळत नाही. त्यामुळे महिलांनी सण साजरे करत असताना आपले विचार बदलून जिथे गरज आहे.तिथे या वस्तू दान केल्या तर गरजवंतांची गरज भागेलं. आपल्याला ही त्यातून मानसिक समाधान मिळेल असे राणी कर्डीले म्हणाल्या.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…