नागरिकांची लूट, पोलिसांची दुर्लक्ष
शिरूर (अरुणकुमार मोटे): कामगार विभागाच्या विविध योजनांतर्गत गरीब आणि गरजू कामगार लाभार्थ्यांना मोफत अत्यावश्यक वस्तू, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी साहित्य वितरित केले जात आहे. परंतु, शिरूर शहरासह तालुक्यात काही ठिकाणी या योजनेच्या नावाखाली दलालांनी उघडपणे पैसे उकळण्याचा धंदा सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नागरिकांची खुलेआम फसवणूक होत असून, पोलिस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.
शहरातील अबिंका माता मंदिर (सिद्धार्थनगर गुलमोहोर बिल्डिंग), मुंबई बाजार, शाळा क्र. ५, शिवसेवा वखार शेजारी, तसेच जुने मार्केट यार्डमधील गाळे आणि ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये हा प्रकार बिनधास्त सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत.परंतु अद्याप कुणावरही कारवाई झाली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. “सरकारचा उद्देश गरीब कुटुंबांना मोफत साहित्य देण्याचा आहे. मात्र, दलाल मंडळी पाचशे रुपये फॉर्म भरण्यासाठी आणि पंधराशे रुपये साहित्य मिळवण्यासाठी उकळत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
कामगार विभागाकडून वाटप करण्यात येणाऱ्या साहित्यासाठी सरकारकडून सुमारे १०,००० रुपयांचे साहित्य मोफत दिले जाते. परंतु दलाल मंडळी या योजनेच्या नावाखाली सामान्य कामगारांकडून नगदी रक्कम उकळत असून, या कृत्यामुळे सरकारच्या कल्याणकारी योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शिरूर शहरातील सजग नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही शिरूर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, दलालांचे मनोबल वाढले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.
शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन विशेष तपास यंत्रणा गठीत करावी, संपूर्ण जिल्ह्यात मोफत साहित्य वाटप प्रक्रियेवर कडक नजर ठेवावी, आणि दोषी दलालांवर गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…