शिरुर (किरण पिंगळे) महिलांनी नागपंचमी हा सण साजरा करावा. परंतु दूध आणि लाह्या वारुळात ओतून देण्यापेक्षा जिथे जमेल तिथे गरजूंना दूध वाटप करावे. देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. म्हणून सर्व माता-भगिनी यांनी आपले विचार बदला आणि समाजउपयोगी कार्य करत रहा असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी केले. सोमवार (दि 21) रोजी नागपंचमी निमित्त गोरगरीब मुलांना दरवर्षी प्रमाणे दुधाचे वाटप करुन त्यांनी नागपंचमीचा सण साजरा केला.
सध्या देवाधर्माच्या नावावर अनेक ठिकाणी अंधश्रद्धेच्या नावाखाली अनावश्यक खर्च केला जातो. देवाच्या नावाखाली हजारो लिटर दुधाचा अभिषेक सुद्धा घातला जातो. मात्र मंदिराबाहेर बसणाऱ्या भिकाऱ्यांना कुणी पोटाला नीट दोन वेळेचं अन्न देत नाही. त्यामुळे साधू संताच्या जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा या उक्तीप्रमाणे सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेल्या राणी कर्डिले यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही समाजाभिमुख उपक्रम राबवत धर्म जपा, पण अंधभक्त न होता ,गरजूंना सहकार्य करत जा असा संदेश दिला.
ग्रामीण भागातील महिला नागपंचमी हा सण मोठया आनंदात साजरा करतात. या दिवशी महिला सुवासिनी वारुळाला जाऊन पूजा करतात. तर काही ठिकाणी वारुळात दूध ओततात तसेच लाह्या वाहतात. रामलिंग येथील सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले या नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात. नागपंचमी सणानिमित्त रामलिंग येथील महिलांनी फेर धरले, फुगड्या खेळल्या, वारुळाला पण गेल्या. मात्र तिथे दुध किंवा लाह्या यापैकी काहीही अर्पण केले नाही. त्यामुळे काही प्रमाणात महिला बदल घडवत असल्याचे दिसत असल्याचे कर्डिले म्हणाल्या. यावेळी गायत्री डींगरे, आशा जाधव, आत्या जाधव,अनिता शिंदे, भोसले तसेच अनेक जेष्ठ महिला उपस्थित होत्या.
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…