शिरूर तालुका

आदिवासी समाजाच्या घरांसाठी काही जागा राखीव

शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायत घेणार अनोखा निर्णय

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीचे घर कोसळले. ५ वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये देखील हेच घर कोसळून एका बालकाचा मृत्यू होत बालकाचे आई व आजी जखमी झाले होते. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा प्रसंग उद्भवला असल्याने अशा आदिवासी ठाकर समाजाच्या घरांसाठी २० गुंठे जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंदूर ग्रामपंचायत घेणार असल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी दिली आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथे खेड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गाव असून येथील आदिवासी ठाकर समाज शासकीय सुविधांपासून वंचित असून सदर ठिकाणी सुमारे २५ आदिवासी कुटुंबीय राहत आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले. या सर्व परिस्थितीचा विचार करुन या आदिवासी कुटुंबांसाठी गावकीची सुमारे २० गुंठे जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत मासिक मीटिंग अथवा ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात येणार असून येथील कुटुंबाना आदिवासी समाजासाठी असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रयत्न करणार आहे.

केंदूर येथे सुमारे २ हजार लोकसंख्या आदिवासी ठाकर समाजाची आहे. येथील ठाकर समाज सुविधांपासून वंचित असून त्यांना दाखले देखील उपलब्ध होत नाहीत. ५ वर्षांपूर्वी रामा गावडे यांच्या कुटुंबाच्या नुकसान भरपाईसाठी या घटनेचा पंचनामा व प्रशासनाने केला होता. परंतु अध्यापही या कुटुंबाला मदत मिळू शकलेली नाही. शासकीय नियमांच्या अडथळ्याचा फटका या आदिवासी ठाकर समाजाला असून येथील समाजाला योग्य सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे देखील सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

12 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

12 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

12 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

14 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

16 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

16 तास ago