शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायत घेणार अनोखा निर्णय
शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीचे घर कोसळले. ५ वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये देखील हेच घर कोसळून एका बालकाचा मृत्यू होत बालकाचे आई व आजी जखमी झाले होते. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा प्रसंग उद्भवला असल्याने अशा आदिवासी ठाकर समाजाच्या घरांसाठी २० गुंठे जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंदूर ग्रामपंचायत घेणार असल्याची माहिती सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी दिली आहे.
केंदूर (ता. शिरुर) येथे खेड तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले गाव असून येथील आदिवासी ठाकर समाज शासकीय सुविधांपासून वंचित असून सदर ठिकाणी सुमारे २५ आदिवासी कुटुंबीय राहत आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले. या सर्व परिस्थितीचा विचार करुन या आदिवासी कुटुंबांसाठी गावकीची सुमारे २० गुंठे जागा घर बांधण्यासाठी उपलब्ध करुन देण्याबाबत मासिक मीटिंग अथवा ग्रामसभेमध्ये निर्णय घेण्यात येणार असून येथील कुटुंबाना आदिवासी समाजासाठी असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रयत्न करणार आहे.
केंदूर येथे सुमारे २ हजार लोकसंख्या आदिवासी ठाकर समाजाची आहे. येथील ठाकर समाज सुविधांपासून वंचित असून त्यांना दाखले देखील उपलब्ध होत नाहीत. ५ वर्षांपूर्वी रामा गावडे यांच्या कुटुंबाच्या नुकसान भरपाईसाठी या घटनेचा पंचनामा व प्रशासनाने केला होता. परंतु अध्यापही या कुटुंबाला मदत मिळू शकलेली नाही. शासकीय नियमांच्या अडथळ्याचा फटका या आदिवासी ठाकर समाजाला असून येथील समाजाला योग्य सुविधा पुरवल्या जाणार असल्याचे देखील सरपंच अविनाश साकोरे व उपसरपंच योगिता थिटे यांनी सांगितले आहे.
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…