शिरूर तालुका

केंदूर व करंदीच्या शालेय गरजू मुलांना मिळाला मदतीचा हात

केंदूरच्या आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर मदतीने फुलले चैतन्य

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): केंदूर (ता. शिरुर) सह करंदी येथील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याने येथील शालेय गरजू मुलांना मदतीचा हात मिळाला आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व करंदी येथील विद्या विकास मंदिर या शाळेतील शालेय गरजू मुलांना महाराष्ट्र शिवसन्मान पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते शेरखान शेख यांच्या माध्यमातून नुकतेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी करंदी गावच्या पोलीस पाटील वंदना साबळे, डॉ. नितीन सोनवणे, प्राचार्य रणजित गावित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, अनिल साकोरे, चंद्रकांत थिटे, संजय जोहरे, मोतीराम वागतकर, मनोज दोंड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश संघटक जावेद इनामदार, करंदीचे प्राचार्य दत्तात्रय बनसोडे, डॉ. प्रतिक पलांडे यांसह आदी उपस्थित होते.

शिरुर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेल्या केंदूर गावात आदिवासी ठाकर समाजातील खूप मोठ्या प्रमाणात कुटूंब वास्तव्यास असून येथील सर्व मुले केंदूर येथील शाळेत शिक्षण घेतात. मात्र सदर मुलांना अनेक शैक्षणिक अडचणी येत असल्याने स्वरुपाची मदत मिळाल्याने या मुलांना खूप मोठा आधार मिळत असल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब धस यांनी केले तर चंद्रकांत थिटे यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

7 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

7 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

7 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

7 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

11 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

11 तास ago