शिक्रापूरच्या आरतीने मिळवले लेखा परीक्षक पद
शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आरती केंडे- ब्राम्हणे हिने आई वडिलांची परिस्थिती हलाकीची असताना देखील परिस्थितीवर मात करत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन नगर विकास परिषदेतील लेखा परीक्षक पदाला गवसणी घातली असता नुकतीच रायगड जिल्ह्यातील म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
शिक्रापूर ता. शिरुर येथे नोकरीच्या निमित्ताने जालना येथून शिक्रापूर येथे स्थायिक झालेले राधाकृष्ण केंडे यांना दोन मुले व एकुलती एक मुलगी आरती मात्र राधाकृष्ण केंडे यांनी होमगार्डची नोकरी करत परिस्थितीशी दोन हात करत मुलांना शिक्षण दिले, सन २०१३ मध्ये आरती बी. ए. च्या पहिल्या वर्षात असताना शिक्रापूर येथील महेश ब्राम्हणे यांच्याशी आरतीचा विवाह ठरत असताना केंडे कुटुंबाने आरतीच्या पुढील शिक्षणासाठी आग्रह ठेवला.
दरम्यान ब्राम्हणे कुटुंबाने देखील आरतीला आपली सून करुन घेत तिचे उच्चशिक्षण पूर्ण केले. मात्र आरतीने स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करत नगरविकास विभागातील लेखा परीक्षक परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून केंडे व ब्राम्हणे या दोन्ही घराण्याचे नाव उज्वल केले, सध्या आरती रायगड जिल्ह्यातील म्हसाळा नगर परिषदेत लेखा परीक्षकपदी नियुक्त झाली आहे. गेली ४० वर्षांपासून शिक्रापूर ग्रामस्थांनी केंडे व ब्राम्हणे या दोन्ही कुटुंबाचे कष्ट पाहिलेले असताना आरतीच्या यशामुळे दोन्ही कुटुंबियांचे शिक्रापुरात कौतुक होत आहे.
आरतीचा दोन्ही कुटुंबांना अभिमान: महेश ब्राम्हणे
आरतीने लग्नापूर्वी आई वडिलांचे तसेच लग्नानंतर आमचे कुटुंब संभाळून शिक्रापूर येथील दररोज वाघोली व पुणे येथे प्रवास करुन यश मिळविले असताना सध्या उच्च पदावर कार्यरत झाली असल्याने आरतीचा आम्हा दोन्ही कुटुंबियांना अभिमान असल्याचे आरतीचे पती महेश ब्राम्हणे यांनी सांगितले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…