शिरूर तालुका

माथाडीच्या नावाखाली बोगस पैसे उकळल्यास कायदेशीर कारवाई: उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): माथाडी कायद्याप्रमाणे जे खरोखरच माथाडी आहेत. त्यांना न्याय देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून, माथाडी कामगारांवर अन्याय होऊ नये. तसेच त्यांच्या कुटुंबावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार काळजी घेत आहे. परंतु, माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या फाडून पैसे उकळणे ही चुकीची प्रवृत्ती असून जर माथाडीच्या नावाखाली माथाडीशी कसलाही संबंध नसलेल्या संघटना दादागिरी करत असतील तर त्यांच्यावर FIR दाखल करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या देऊन राष्ट्रवादीचे काही बडे नेते आणि त्यांचे बगलबच्चे बेकायदेशीररित्या पैसे उकळत असल्याची तक्रार शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. त्याच अनुषंगाने उद्योगमंत्री सावंत यांनी माथाडी बाबत सुचक विधान केले आहे.

रांजणगाव एमआयडीसी येथे रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) च्या कार्यालयात झालेल्या बैठकीत रांजणगाव औद्योगिक वसाहतीत येणाऱ्या अनेक समस्यांबाबत उद्योगमंत्री यांनी रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे पदाधिकारी तसेच कंपन्यांचे पदाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, शिवसेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल काशीद व मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

3 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

10 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

10 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

10 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

10 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

10 तास ago