laxmibai-bendra-aamble
शिरूर: शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील लक्ष्मीबाई ऊर्फ ताई शंकरराव बेंद्रे (पाटील) यांचे वयाच्या १०७व्या वर्षी सोमवारी (ता. १८) वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सात मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
संजय बेंद्रे, निलेश बेंद्रे, उत्कर्ष बेंद्रे, शालन लेणे, सुलेचना खंडागळे, सुमन थिटे, डॉ. सीमा सातव, डॉ. विठ्ठल सातव, वंदन मोरे, उद्योजक चंद्रकांत मोरे, बाळासाहेब शेळके या सर्वांच्या त्या ताई होत.
लक्ष्मीबाई शंकरराव बेंद्रे यांचा १ जून १९१९ रोजी तळेगाव ढमढेरे येथे जन्म झाला होता. आंबळे गावचे पाटील शंकरराव बेंद्रे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता. जुन्या काळातील जन्म असल्यामुळे त्यांनी इंग्रजांचा काळ पाहिला होता. जुन्या काळातील अनेक आठवणी ते नातवंडांना, पतवंडांना सांगत. दिपाली शेळके यांनी त्यांच्या जीवनावर आधारीत ‘वात्सल्यमूर्ती ताई!’ हे पुस्तक लिहीले असून, ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. संबंधित पुस्तकामध्ये विविध जुन्या काळातील अनेक आठवणींचा आढावा घेण्यात आला आहे.
लक्ष्मीबाई ऊर्फ ताई यांची १०६व्या वर्षीही त्यांची बुद्धी अगदी तल्लख होती. बालपणापासून ते आजपर्यंतची प्रत्येक गोष्ट खडा न खडा त्यांच्या लक्षात होती. शिवाय, त्यांचे दात पण मजबूत आणि जशेच्या तसे होते. १०६व्या वर्षीही त्या ऊस खात होत्या. दरम्यान, आंबळे गावामध्ये बुधवारी (ता. २७) दशक्रियेचा विधी होणार आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…