शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात सोळा तास उलटूनही पावसाचा कहर कायम; पिकं पाण्याखाली…

शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पाले भाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.

कांद्याची खर्चिक लागवड उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी वर्गात हतबलता पसरली आहे. अनेक शेतात पाणी ओसंडून गेल्याने उभे पीक आडवे झाले असून, नाले व ओढ्यांना पूर आल्याने पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाने सिंचन केलेली पिके एका रात्रीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या अनपेक्षित आपत्तीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकरी प्रतिनिधींनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी केली आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसानाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शिरूर तालुक्यातील शेती पाण्याखाली गेल्याचे विदारक चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात असहाय्यतेची भावना दाटून आली आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी तालुकाभरातून होत आहे.

सविंदणे- लोणी रस्ता गेला खड्ड्यात, रस्त्याची दुरावस्था झाल्याने होतायेत अपघात 

शिरूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अज्ञातांनी टाकले गतिरोधक; वाहनचालक संतप्त

रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

भरधाव टँकरची दुचाकीला धडक दिल्याने हलाखीच्या जीवनाशी झुंज देणाऱ्या महिलेवर काळाचा घाला 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

29 मिनिटे ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

36 मिनिटे ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

5 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

5 तास ago

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…

5 तास ago

मोठी स्वप्ने पाहा, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…

5 तास ago