शिरूर तालुका

नामावंत तमाशा फडमालक गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे निधन

कवठे येमाई: नामावंत तमाशा फडमालक, ढोलकीचा बादशाहा व शासनाचा जीवनगौरव पुरस्कार पटकावलेले गंगाराम बुवा रेणके (कवठेकर) यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले आहे.

कवठे येमाई येथील गंगाराम बुवा कवठेकर यांनी एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक, ज्येष्ठ ढोलकी पटू, लोकगीतकार, लेखक व कवी म्हणून नावारुपाला येवून महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांवर अनेक वर्ष राज्य केले होते. ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके यांचे यांचे आज (गुरुवार) पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते ९६ वर्षांचे होते. महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च अशा जीवनगौरव पुरस्काराने गंगारामबुवांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने समस्त रेणके परिवारासह कवठे येमाई गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्राथमिक शिक्षक राजेंद्र रेणके यांचे ते वडील होत. युवा सामाजिक कार्यकर्ते विशाल (सनी) रेणके, अनिकेत रेणके यांचे ते आजोबा होत.

त्यांच्या निधनाबद्दल माजी गृहमंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, दामुशेठ घोडे, भीमाशंकर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, बेल्हा लोकनाट्य राज्यस्तरीय तमाशा महोत्सवाचे अध्यक्ष वसंतराव जगताप, आझाद बोरगावकर, सरपंच सुनीता पोकळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा, वैशाली रत्नपारखी,मधुकर रोकडे, वसंत पडवळ, अभिजित लंघे व अनेक ग्रामस्थांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावचे नाव कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचे काम या कलावंताने केले आहे. अशा या कलावतांला भावपुर्ण श्रद्धांजली.
दिपक रत्नपारखी (मा. सरपंच कवठे येमाई)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago