शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता पुन्हा करंदी ग्रामपंचायतने सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र असल्याशिवाय कोणाला देणगी अथवा लोकवर्गणी देऊ नये, असा अजब ठराव घेतल्याचे समोर आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी ग्रामसभेत काही वेगळे ठराव घेतल्याने त्याबाबत काही तक्रारी झालेल्या आहेत तर अनेकदा ग्रामपंचायतचे ठराव देखील वादग्रस्त ठरलेले आहे. परंतु गावातील अंतर्गत राजकारणामध्ये ग्रामपंचायत भरडली जाण्याचे प्रकार आज देखील सुरु आहे.
सध्या ग्रामपंचायतने हद्दीतील काही कंपन्यांना नोटीस दिलेले असून मासिक मिटिंग मध्ये ठराव झालेला असून त्यानुसार कंपन्यांनी गावातील कोणत्याच व्यक्तीस, मंडळास, देवस्थानास तसेच संस्थेस लोकवर्गणी देताना सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र व ठराव असल्याशिवाय देगणी देऊ नये असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे व सरपंच सोनाली ढोकले यांच्या सहीचे नोटीस दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पोलीस अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सदर बाब काही कंपन्यांच्या प्रतीनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे चालले तरी काय असा प्रश्न कंपन्यांच्या प्रतिनिधींना पडला आहे.
सदर पत्राबाबत चौकशी केली जाईल; अजित देसाई
करंदी ग्रामपंचायतने काही कंपन्यांना दिलेल्या पत्राची माहिती आम्हाला मिळालेली असून त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी सांगितले.
न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…
मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…
मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…
पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…
शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…
पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…