शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता पुन्हा करंदी ग्रामपंचायतने सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र असल्याशिवाय कोणाला देणगी अथवा लोकवर्गणी देऊ नये, असा अजब ठराव घेतल्याचे समोर आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी ग्रामसभेत काही वेगळे ठराव घेतल्याने त्याबाबत काही तक्रारी झालेल्या आहेत तर अनेकदा ग्रामपंचायतचे ठराव देखील वादग्रस्त ठरलेले आहे. परंतु गावातील अंतर्गत राजकारणामध्ये ग्रामपंचायत भरडली जाण्याचे प्रकार आज देखील सुरु आहे.
सध्या ग्रामपंचायतने हद्दीतील काही कंपन्यांना नोटीस दिलेले असून मासिक मिटिंग मध्ये ठराव झालेला असून त्यानुसार कंपन्यांनी गावातील कोणत्याच व्यक्तीस, मंडळास, देवस्थानास तसेच संस्थेस लोकवर्गणी देताना सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र व ठराव असल्याशिवाय देगणी देऊ नये असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे व सरपंच सोनाली ढोकले यांच्या सहीचे नोटीस दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या पोलीस अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सदर बाब काही कंपन्यांच्या प्रतीनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे चालले तरी काय असा प्रश्न कंपन्यांच्या प्रतिनिधींना पडला आहे.
सदर पत्राबाबत चौकशी केली जाईल; अजित देसाई
करंदी ग्रामपंचायतने काही कंपन्यांना दिलेल्या पत्राची माहिती आम्हाला मिळालेली असून त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी सांगितले.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…