शिरूर तालुका

करंदी ग्रामपंचायतचा पुन्हा एकदा अजब ठराव

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता पुन्हा करंदी ग्रामपंचायतने सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र असल्याशिवाय कोणाला देणगी अथवा लोकवर्गणी देऊ नये, असा अजब ठराव घेतल्याचे समोर आले आहे.

करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी ग्रामसभेत काही वेगळे ठराव घेतल्याने त्याबाबत काही तक्रारी झालेल्या आहेत तर अनेकदा ग्रामपंचायतचे ठराव देखील वादग्रस्त ठरलेले आहे. परंतु गावातील अंतर्गत राजकारणामध्ये ग्रामपंचायत भरडली जाण्याचे प्रकार आज देखील सुरु आहे.

सध्या ग्रामपंचायतने हद्दीतील काही कंपन्यांना नोटीस दिलेले असून मासिक मिटिंग मध्ये ठराव झालेला असून त्यानुसार कंपन्यांनी गावातील कोणत्याच व्यक्तीस, मंडळास, देवस्थानास तसेच संस्थेस लोकवर्गणी देताना सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र व ठराव असल्याशिवाय देगणी देऊ नये असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे व सरपंच सोनाली ढोकले यांच्या सहीचे नोटीस दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पोलीस अधिकारी व कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत सदर बाब काही कंपन्यांच्या प्रतीनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचे चालले तरी काय असा प्रश्न कंपन्यांच्या प्रतिनिधींना पडला आहे.

सदर पत्राबाबत चौकशी केली जाईल; अजित देसाई

करंदी ग्रामपंचायतने काही कंपन्यांना दिलेल्या पत्राची माहिती आम्हाला मिळालेली असून त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयकडे चौकशी करण्यात येणार असल्याचे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

13 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

14 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

14 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

14 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

19 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

19 तास ago