शिरुर तालुक्यात वाढला तापमानाचा आकडा; किती ते पहा….

शिक्रापूर सह परिसरात तापमान चाळीसच्या वर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्हयासह अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत असताना मात्र कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असल्याने शिरुर करांची लाहीलाही झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे, काही ठिकाणी पाउस पडत असताना काही ठिकाणी तीव्र ऊन जाणवत आहे. पुणे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश असताना शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कमाल तापमान 40 असल्याने नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागला असून नागरिकांची लाहीलाही झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांनी घरास बसने पसंत केल्याचे रस्ते व बाजारपेठा देखील ओस पडल्याचे दिसून आले. तर वातावरणात देखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले असताना या महिन्यात आजचे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी; डॉ. शरद लांडगे

उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर त्याचा परिणाम मानवी शरीरावर होऊन शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, पाण्यात मीठ, साखरेचा वापर करावा विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळात घरात रहावे तसेच विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. शरद लांडगे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago