शिरुर तालुक्यात वाढला तापमानाचा आकडा; किती ते पहा….

शिक्रापूर सह परिसरात तापमान चाळीसच्या वर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्हयासह अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत असताना मात्र कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असल्याने शिरुर करांची लाहीलाही झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे, काही ठिकाणी पाउस पडत असताना काही ठिकाणी तीव्र ऊन जाणवत आहे. पुणे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश असताना शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कमाल तापमान 40 असल्याने नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागला असून नागरिकांची लाहीलाही झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांनी घरास बसने पसंत केल्याचे रस्ते व बाजारपेठा देखील ओस पडल्याचे दिसून आले. तर वातावरणात देखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले असताना या महिन्यात आजचे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी; डॉ. शरद लांडगे

उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर त्याचा परिणाम मानवी शरीरावर होऊन शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, पाण्यात मीठ, साखरेचा वापर करावा विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळात घरात रहावे तसेच विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. शरद लांडगे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

14 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago