शिरुर तालुक्यात वाढला तापमानाचा आकडा; किती ते पहा….

शिक्रापूर सह परिसरात तापमान चाळीसच्या वर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्हयासह अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत असताना मात्र कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असल्याने शिरुर करांची लाहीलाही झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे.

महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे, काही ठिकाणी पाउस पडत असताना काही ठिकाणी तीव्र ऊन जाणवत आहे. पुणे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश असताना शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कमाल तापमान 40 असल्याने नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागला असून नागरिकांची लाहीलाही झाल्याचे दिसून आले तर अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांनी घरास बसने पसंत केल्याचे रस्ते व बाजारपेठा देखील ओस पडल्याचे दिसून आले. तर वातावरणात देखील मोठा बदल झाल्याचे दिसून आले असताना या महिन्यात आजचे तापमान सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी; डॉ. शरद लांडगे

उष्णतेचे प्रमाण जास्त झाल्यानंतर त्याचा परिणाम मानवी शरीरावर होऊन शरीरातील पाणी कमी होते त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, पाण्यात मीठ, साखरेचा वापर करावा विशेषतः दुपारी 12 ते 3 या वेळात घरात रहावे तसेच विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन डॉ. शरद लांडगे यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

3 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

7 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

7 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

7 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

7 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

10 तास ago