शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध
शिरूर (सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,’ अशी शिरूर तालुक्यातील संस्थेच्या विविध कार्यकारी सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांनी भावना व्यक्त केली आहे.
‘अजितदादा हे सहकार चळवळीशी जोडलेले होते. सहकारी साखर कारखाने, बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी संस्था आणि कृषी आधारित सहकारी संस्थांमध्ये त्यांची भूमिका नेहमीच प्रभावी राहिली होती.विविध कार्यकारी संस्थेत काम करणाऱ्या सचिवांना दादांनी नेहमी योग्य न्याय दिला.सोसायटी सचिवाच्या वतीने आयोजित श्रद्धांजली सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिरूरचा नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधा, औद्योगिक वाढ तसेच जीवनमानात नागरिकांच्या झालेला सकारात्मक बदल हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा ठसा आहे. यावेळी सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून अजित पवार यांना आदरांजली वाहिली.
त्यांच्या विचारांचा आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी शिरूर तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार,सचिव कैलास लोहार, अनिल वाबळे, सुभाष सातकर, खंडू जगताप, सुखदेव खर्डे यांनी भावना व्यक्त करून आठवणींना उजाळा दिला. तसेच शिरूर तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थेवर काम करणारे सर्व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…