शिरूर तालुका

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. एका निष्पाप महिलेबरोबर तिच्या दोन लहान चिमुकल्यांना निर्घृणपणे ठार मारून पेटवून टाकण्यात आले. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा अमानुष प्रयत्न… या घटनांनी माणुसकीची सगळी सीमा ओलांडली आहे.

या घटनेला केवळ “गुन्हा” म्हणून बघणे चुकीचे ठरेल. ही घटना समाजातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक गडद आरसा आहे. एक महिला आणि तिची दोन मुलं, कोणत्याही समाजात अत्यंत सुरक्षित गृहीत धरली जातात. मात्र इथे त्यांनाच लक्ष्य करण्यात आलं, तेही इतक्या क्रूर पद्धतीने. त्यांच्या ओळखीची एकमेव शिल्लक खूण म्हणजे महिलेच्या हातावरील ‘जय भीम’ आणि काही इंग्रजी टॅटू. यातून त्या महिलेच्या अस्तित्वाचा आवाज ऐकू येतो — समाजातील एक उपेक्षित, कदाचित अत्याचार सहन करणारी महिला, जी आता केवळ पोळलेल्या शरीराच्या रूपात उरली आहे.

पोलिसांकडून तपास युद्धपातळीवर चालू आहे, ही गोष्ट नक्कीच सकारात्मक आहे. पण या तपासातून केवळ आरोपी सापडणे पुरेसे नाही, तर आपल्याला या घटनांचे मुळ शोधून समाज म्हणून काही कठोर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. महिलेची ओळख पटेपर्यंत हे प्रकरण अनामिक राहणार आहे. आणि इथेच समाज म्हणून आपली शरम वाटायला हवी — आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना इतकं विसरतो का?

मीडिया आणि जनतेची जबाबदारी….

मीडिया आणि सामान्य नागरिकांनी या प्रकरणाला केवळ “ब्रेकिंग न्यूज” म्हणून न पाहता, या घटनेतील मानवी वेदना समजून घेतल्या पाहिजेत. कोणतीही घटना ही कधीच एकटी राहत नाही; ती आपल्या मनोवृत्तीचे, व्यवस्थेचे आणि सामाजिक जाणीवांचे प्रतिबिंब असते. जर अशी घटना आपल्याला अंतर्मुख करत नसेल, तर आपले समाज म्हणून जिवंत असणेच धोक्यात आले आहे.

या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते — सामाजिक सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा सरकारची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या शेजारी कोण राहतो, त्यांच्या आयुष्यात काय घडतंय, हे जाणून घेण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक घरात आणि प्रत्येक गल्लीत एक समाज सजग असला पाहिजे. कारण अशा घटनांमध्ये थांबवायचं असेल, तर “माणूस” म्हणून आपली संवेदना जागी असावी लागेल.

रांजणगावात घडलेली ही घटना हे केवळ गुन्हेगारीचे प्रकरण नाही, तर आपल्या समाजाच्या सुन्नपणाचे द्योतक आहे. यातील चिमुकल्या जीवांचा आक्रोश फक्त पोलिसांना नाही, तर प्रत्येक संवेदनशील माणसाला ऐकू यायला हवा. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदे आणि यंत्रणा यांच्याइतकीच गरज आहे – जिवंत, जागृत, आणि जबाबदार समाजाची..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

29 मिनिटे ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

32 मिनिटे ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

36 मिनिटे ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

39 मिनिटे ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

41 मिनिटे ago

MPSC पेपरफुटीचा आरोप; तरुणांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अन्यथा भाजपाला महागात पडेल; हर्षवर्धन सपकाळ

टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही…

48 मिनिटे ago