शिरूर तालुका

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात उघडकीस आलेल्या तिहेरी हत्याकांडाने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकले आहे. एका निष्पाप महिलेबरोबर तिच्या दोन लहान चिमुकल्यांना निर्घृणपणे ठार मारून पेटवून टाकण्यात आले. मृतदेहांची ओळख पटू नये म्हणून त्यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा अमानुष प्रयत्न… या घटनांनी माणुसकीची सगळी सीमा ओलांडली आहे.

या घटनेला केवळ “गुन्हा” म्हणून बघणे चुकीचे ठरेल. ही घटना समाजातील सुरक्षिततेच्या दृष्टीने एक गडद आरसा आहे. एक महिला आणि तिची दोन मुलं, कोणत्याही समाजात अत्यंत सुरक्षित गृहीत धरली जातात. मात्र इथे त्यांनाच लक्ष्य करण्यात आलं, तेही इतक्या क्रूर पद्धतीने. त्यांच्या ओळखीची एकमेव शिल्लक खूण म्हणजे महिलेच्या हातावरील ‘जय भीम’ आणि काही इंग्रजी टॅटू. यातून त्या महिलेच्या अस्तित्वाचा आवाज ऐकू येतो — समाजातील एक उपेक्षित, कदाचित अत्याचार सहन करणारी महिला, जी आता केवळ पोळलेल्या शरीराच्या रूपात उरली आहे.

पोलिसांकडून तपास युद्धपातळीवर चालू आहे, ही गोष्ट नक्कीच सकारात्मक आहे. पण या तपासातून केवळ आरोपी सापडणे पुरेसे नाही, तर आपल्याला या घटनांचे मुळ शोधून समाज म्हणून काही कठोर आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. महिलेची ओळख पटेपर्यंत हे प्रकरण अनामिक राहणार आहे. आणि इथेच समाज म्हणून आपली शरम वाटायला हवी — आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना इतकं विसरतो का?

मीडिया आणि जनतेची जबाबदारी….

मीडिया आणि सामान्य नागरिकांनी या प्रकरणाला केवळ “ब्रेकिंग न्यूज” म्हणून न पाहता, या घटनेतील मानवी वेदना समजून घेतल्या पाहिजेत. कोणतीही घटना ही कधीच एकटी राहत नाही; ती आपल्या मनोवृत्तीचे, व्यवस्थेचे आणि सामाजिक जाणीवांचे प्रतिबिंब असते. जर अशी घटना आपल्याला अंतर्मुख करत नसेल, तर आपले समाज म्हणून जिवंत असणेच धोक्यात आले आहे.

या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते — सामाजिक सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा सरकारची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या शेजारी कोण राहतो, त्यांच्या आयुष्यात काय घडतंय, हे जाणून घेण्याची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक घरात आणि प्रत्येक गल्लीत एक समाज सजग असला पाहिजे. कारण अशा घटनांमध्ये थांबवायचं असेल, तर “माणूस” म्हणून आपली संवेदना जागी असावी लागेल.

रांजणगावात घडलेली ही घटना हे केवळ गुन्हेगारीचे प्रकरण नाही, तर आपल्या समाजाच्या सुन्नपणाचे द्योतक आहे. यातील चिमुकल्या जीवांचा आक्रोश फक्त पोलिसांना नाही, तर प्रत्येक संवेदनशील माणसाला ऐकू यायला हवा. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदे आणि यंत्रणा यांच्याइतकीच गरज आहे – जिवंत, जागृत, आणि जबाबदार समाजाची..

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

23 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

23 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

23 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago