शिरुर (नितीन थोरात): शिरुर तालुक्यातील आमदाबाद परिसरात पुन्हा एकदा वीज रोहित्र चोरीचा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी याच गावात तीन रोहित्र फोडले गेले होते. तरीही एकही आरोपी जेरबंद न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढतच आहे.
तालुक्यात रोहित्र चोरी संघटित टोळीमार्फत सुरु असलेले खुले आव्हान बनले आहे. ऐन शेतीच्या हंगामात वीज तोडली जात असल्याने विहिरी, बोअरवेल,ठिबक सिंचन व्यवस्था ठप्प पडली असून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.
शिरुर तालुक्यात सध्या भंगाराची दुकाने वाढली असुन त्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. सध्या तांब्याला भाव वाढल्याने चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे असे चोरीचे सामान खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी हि मागणी जोर धरु लागली आहे.
त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे रोहित्र चोरीमुळे अजूनच आर्थिक नुकसान होतं आहे. मात्र हातावर हात धरुन बसलेली यंत्रणा
“रोहित्र चोरांचा कायमचा बंदोबस्त करणार की नाही…?” “शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?” असे सवाल आता गावोगावचे शेतकरी विचारत आहेत.
त्यासाठीच पोलिसांनी तात्काळ विशेष पथक नेमून रात्रगस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…
दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…