शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात रोहित्र चोरी सुरुच; प्रशासन झोपेत, शेतकरी उघड्यावर!

शिरुर (नितीन थोरात): शिरुर तालुक्यातील आमदाबाद परिसरात पुन्हा एकदा वीज रोहित्र चोरीचा प्रकार घडला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. काही दिवसांपुर्वी याच गावात तीन रोहित्र फोडले गेले होते. तरीही एकही आरोपी जेरबंद न झाल्याने चोरट्यांचे धाडस वाढतच आहे.

तालुक्यात रोहित्र चोरी संघटित टोळीमार्फत सुरु असलेले खुले आव्हान बनले आहे. ऐन शेतीच्या हंगामात वीज तोडली जात असल्याने विहिरी, बोअरवेल,ठिबक सिंचन व्यवस्था ठप्प पडली असून शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.

शिरुर तालुक्यात सध्या भंगाराची दुकाने वाढली असुन त्यावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. सध्या तांब्याला भाव वाढल्याने चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे असे चोरीचे सामान खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी हि मागणी जोर धरु लागली आहे.

त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांचे रोहित्र चोरीमुळे अजूनच आर्थिक नुकसान होतं आहे. मात्र हातावर हात धरुन बसलेली यंत्रणा

“रोहित्र चोरांचा कायमचा बंदोबस्त करणार की नाही…?” “शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?” असे सवाल आता गावोगावचे शेतकरी विचारत आहेत.

त्यासाठीच पोलिसांनी तात्काळ विशेष पथक नेमून रात्रगस्त वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

15 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

21 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

21 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

21 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

21 तास ago