मुख्य बातम्या

शिरुर! राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): “राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या विचारांमधूनच स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे शिवरायांच्या मनात रोवली गेली. तसेच स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोन्ही महामानवांचे कार्य प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करावेत,” असे आवाहन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले.

रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने कौसल्या कांतीलाल शिंदे तसेच उज्ज्वला सुदाम कुटे यांना आदर्श माता पुरस्काराने, तर ज्येष्ठ पत्रकार सतीश आनंदराव डोंगरे यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगलमूर्ती विद्याधामचे मुख्याध्यापक सुनील थोरात होते. यावेळी रांजणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे, अश्विनी नरवडे व सुवर्णा चिपाडे हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.

यावेळी बोलताना राणी कर्डीले पुढे म्हणाल्या की, “राजमाता जिजाऊ यांनी अत्यंत कठीण काळात धैर्य, शहाणपण आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडवले. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा त्यांनी शिवरायांना दिली. त्यांच्या संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श, प्रजाहितदक्ष आणि लोककल्याणकारी राजा घडले. राजमाता जिजाऊ या मातृत्व, राष्ट्रभक्ती आणि संस्कारांचे तेजस्वी प्रतीक आहेत.” तसेच स्वामी विवेकानंद यांनी स्वतःवर विश्वास ठेवून समाज व राष्ट्रासाठी कार्य करण्याची शिकवण दिल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी संदीप कुटे व पत्रकार तेजस फडके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहेश्वरी माने व स्मिता सुतार यांनी केले, तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक सुभाष पाचकर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

7 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

7 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

9 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

11 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

11 तास ago