आरोग्य

आंघोळीचे ‘सात’ नियम पाळाल तर ‘शतायुषी’ व्हाल आणि निरोगी आयुष्य जगाल

शरीर धर्मासंबंधी विचार करायचा झाला तर शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळ हा दिवसाच्या सुरुवातीचा सोपस्कार झाला. अनेक जण थकून भागून आल्यावर किंवा रात्री शांत झोप लागावी म्हणूनही दुसऱ्यांदा अंघोळ करतात. पण वर म्हटल्या प्रमाणे अंघोळ किती वेळ किंवा किती वेळा करता हे महत्त्वाचे नाही तर पुढील नियमांचे पालन करता का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत!

अंगावर पाणी घेताना बेंबीवर पाणी घालावे, ७७,००० नाड्या केंद्रित असतात. त्या ऍक्टिव्ह झाल्यावर मग डाव्या खांद्यावर पाणी घालावे, शरीर शिथिल होते आणि आंघोळीसाठी तयार होते.

साबणाचा अति वापर त्वचा रुक्ष बनवतो. उटणे, बेसन लावून आठवड्यातून दोनदा आंघोळ करावी. त्यामुळे कोणत्याही मौसमात त्वचा मऊ राहते आणि त्वचेचे रक्षण होते.

अति तापलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास मेंदूला झिणझिण्या येतात, मेंदूवर ताण पडतो. शरीराची त्वचा खराब होते, आजारांना आमंत्रण मिळते. अंघोळीसाठीपाणी कोमट हवे आणि हिवाळा सोडला तर अन्य ऋतूमध्ये गार पाण्याने अंघोळ करणे चांगले.

आंघोळ झाल्यावर घशाला कोरड पडत असेल किंवा सर्दी वाटत असेल तर तोंडात पाणी भरा, डोळे मोठे करा. डोळे ताणले गेले की चेहऱ्याचे स्नायू मोकळे होतात आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही. ही प्रक्रिया अंघोळीनंतर २-४ वेळा करावी. गायकांसाठी हा उत्तम प्रकार आहे.

व्यायाम झाल्या झाल्या अंघोळ करू नये. घाम वाळू द्यावा. बॉडी टेम्परेचर नॉर्मल होऊ द्यावे. अर्ध्या तासाने अंघोळ करावी.

जेवल्यावर किंवा काही खाल्यावर आंघोळ करू नये, आंघोळ झाल्यावर खावे. ब्लोटिंग, गॅस, अपचन होते. जठराग्नी बिघडतो. पचन क्रिया बिघडते. पूर्वी लोक अंघोळ झाल्याशिवाय खात नसत. तीच योग्य पद्धत आहे.

आंघोळ झाल्यावर पाणी प्यावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

3 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

4 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

10 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

18 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago