आरोग्य

आंघोळीचे ‘सात’ नियम पाळाल तर ‘शतायुषी’ व्हाल आणि निरोगी आयुष्य जगाल

शरीर धर्मासंबंधी विचार करायचा झाला तर शुचिर्भूत होण्यासाठी आंघोळ हा दिवसाच्या सुरुवातीचा सोपस्कार झाला. अनेक जण थकून भागून आल्यावर किंवा रात्री शांत झोप लागावी म्हणूनही दुसऱ्यांदा अंघोळ करतात. पण वर म्हटल्या प्रमाणे अंघोळ किती वेळ किंवा किती वेळा करता हे महत्त्वाचे नाही तर पुढील नियमांचे पालन करता का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत!

अंगावर पाणी घेताना बेंबीवर पाणी घालावे, ७७,००० नाड्या केंद्रित असतात. त्या ऍक्टिव्ह झाल्यावर मग डाव्या खांद्यावर पाणी घालावे, शरीर शिथिल होते आणि आंघोळीसाठी तयार होते.

साबणाचा अति वापर त्वचा रुक्ष बनवतो. उटणे, बेसन लावून आठवड्यातून दोनदा आंघोळ करावी. त्यामुळे कोणत्याही मौसमात त्वचा मऊ राहते आणि त्वचेचे रक्षण होते.

अति तापलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास मेंदूला झिणझिण्या येतात, मेंदूवर ताण पडतो. शरीराची त्वचा खराब होते, आजारांना आमंत्रण मिळते. अंघोळीसाठीपाणी कोमट हवे आणि हिवाळा सोडला तर अन्य ऋतूमध्ये गार पाण्याने अंघोळ करणे चांगले.

आंघोळ झाल्यावर घशाला कोरड पडत असेल किंवा सर्दी वाटत असेल तर तोंडात पाणी भरा, डोळे मोठे करा. डोळे ताणले गेले की चेहऱ्याचे स्नायू मोकळे होतात आणि सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही. ही प्रक्रिया अंघोळीनंतर २-४ वेळा करावी. गायकांसाठी हा उत्तम प्रकार आहे.

व्यायाम झाल्या झाल्या अंघोळ करू नये. घाम वाळू द्यावा. बॉडी टेम्परेचर नॉर्मल होऊ द्यावे. अर्ध्या तासाने अंघोळ करावी.

जेवल्यावर किंवा काही खाल्यावर आंघोळ करू नये, आंघोळ झाल्यावर खावे. ब्लोटिंग, गॅस, अपचन होते. जठराग्नी बिघडतो. पचन क्रिया बिघडते. पूर्वी लोक अंघोळ झाल्याशिवाय खात नसत. तीच योग्य पद्धत आहे.

आंघोळ झाल्यावर पाणी प्यावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बॉडी टेम्परेचर नॉर्मल होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

6 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

6 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

6 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

9 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

10 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

10 तास ago