शिरूर तालुका

त्या गब्बर मंडल अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील डोंगरगण येथे वाळूमाफीयांनी वाळू उपसा करून वाळू वाहतुक करताना एका शेतकऱ्याने त्यांचा रस्ता अडवल्याने त्याला जबर मारहाण करूण गंभीर जखमी केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला असुन असा गंभीर प्रकार घडत असताना तेथील मंडल आधिकारी, तलाठी हे काय करत होते…? असा प्रश्न उपस्थित होत असुन गेल्या अनेक वर्षापासून डोंगरगण, टाकळी हाजी, शिनगरवाडी येथे वाळू तसेच मुरुमाचा बेसुमार ऊपसा होत असून मंडल आधिकाऱ्याच्या आशिर्वादाने हे सर्व प्रकार घडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे.

या जबाबदार आधिकाऱ्याची तात्काळ चौकशी होऊन बदली करुन दुसऱ्या मंडल आधिकारी आणि तलाठ्यामार्फत सदर ठिकाणच्या ऊत्खननाचे पंचनामे होणे गरजेचे आहे. नुकतेच काही महिन्यांपुर्वी महसुलमंत्री यांनी ज्या सजाच्या ठिकाणी वाळूचे बेकायेदशीर उत्खनन होताना आढळत्यास तात्काळ त्या सजातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे फर्मान सोडले होते. त्याची आता महसूल विभाग अमंलबजावणी करणार का…? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या मंडल आधिकाऱ्याने नोंदीसाठी अनेक जणांना विनाकारण त्रास दिल्याची चर्चा बेट भागात रंगली असून अनेक जणांनी नाव न छापणाच्या अटीवर आम्हाला कसे लुटले याची हकीगत फोनवरून तसेच प्रत्यक्षात ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधींना सांगितली आहे. अशा गब्बर झालेल्या स्थानिक मंडल आधिकाऱ्याच्या विरोधात जनतेचा रोष प्रंचड वाढला असून त्याच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे…( क्रमश )

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त  शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…

3 तास ago

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

10 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

10 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

10 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

10 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

10 तास ago