शिरूर तालुका

त्या गब्बर मंडल अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील डोंगरगण येथे वाळूमाफीयांनी वाळू उपसा करून वाळू वाहतुक करताना एका शेतकऱ्याने त्यांचा रस्ता अडवल्याने त्याला जबर मारहाण करूण गंभीर जखमी केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला असुन असा गंभीर प्रकार घडत असताना तेथील मंडल आधिकारी, तलाठी हे काय करत होते…? असा प्रश्न उपस्थित होत असुन गेल्या अनेक वर्षापासून डोंगरगण, टाकळी हाजी, शिनगरवाडी येथे वाळू तसेच मुरुमाचा बेसुमार ऊपसा होत असून मंडल आधिकाऱ्याच्या आशिर्वादाने हे सर्व प्रकार घडत असल्याची चर्चा सातत्याने होत आहे.

या जबाबदार आधिकाऱ्याची तात्काळ चौकशी होऊन बदली करुन दुसऱ्या मंडल आधिकारी आणि तलाठ्यामार्फत सदर ठिकाणच्या ऊत्खननाचे पंचनामे होणे गरजेचे आहे. नुकतेच काही महिन्यांपुर्वी महसुलमंत्री यांनी ज्या सजाच्या ठिकाणी वाळूचे बेकायेदशीर उत्खनन होताना आढळत्यास तात्काळ त्या सजातील तलाठी, मंडल आधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे फर्मान सोडले होते. त्याची आता महसूल विभाग अमंलबजावणी करणार का…? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या मंडल आधिकाऱ्याने नोंदीसाठी अनेक जणांना विनाकारण त्रास दिल्याची चर्चा बेट भागात रंगली असून अनेक जणांनी नाव न छापणाच्या अटीवर आम्हाला कसे लुटले याची हकीगत फोनवरून तसेच प्रत्यक्षात ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या प्रतिनिधींना सांगितली आहे. अशा गब्बर झालेल्या स्थानिक मंडल आधिकाऱ्याच्या विरोधात जनतेचा रोष प्रंचड वाढला असून त्याच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे…( क्रमश )

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

20 मिनिटे ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

35 मिनिटे ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

5 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

1 दिवस ago