शिरूर तालुका

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जागृकता करणार: प्रा. मोहीते

शिक्रापूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागृकता आणि साक्षरता निर्माण करुन प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी केले.

unique international school

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्यपदी प्राचार्य काकासाहेब मोहीते यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके, सचिव प्राचार्य रामदास थिटे, उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सहसचिव मारुती कदम, अशोक सरोदे यांसह आदी उपस्थित होते.

सदर सन्मान प्रसंगी बोलताना शिरुर तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात येईल तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत व दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेबाबत असलेले समज, गैरसमज दूर केले जातील, असे आश्वासन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्य प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी यावेळी दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

2 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

2 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

2 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

3 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

24 तास ago