हळदी – कुंकू कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश
शिरूर (अरूणकुमार मोटे): संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करत असतात.यानिमित्त अनेक वेगवेगळे वान दिले जाते.तर्डोबाची वाडी येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले. यावेळी वान म्हणून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वछता खूप महत्वाची असते यासाठी महीलांना स्वछता किट देण्यात आले.त्यामध्ये सेनेटरी पॅड,मास्क, कोलगेट,ब्रश, डेटॉल, बेंडेज,डेटॉल साबण अशा वस्तू देण्यात आल्या.
स्वच्छतेचा संदेश यावेळी दिल्या मुळे खऱ्या अर्थाने ते वान ठरले. संक्रांती नंतर महिला महिनाभर हळदी कुंकू करण्यात व्यस्त असतात. वंचित घटकातील महिला मात्र अशा कार्यक्रमापासून लांबच राहतात . फारसे कोणी यांना सामावून घेताना दिसत नाही.त्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू साजरे केले. यानंतर त्यांना स्वच्छ्ता महत्व सांगितले. तसेच कोणतेही व्यसन करू नये.त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.तसेच मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्याचे आवाहन राणी कर्डिले यांनी केले.यावेळी सागर आव्हाड यांनी सहकार्य केले. यावेळी गीता आढाव,ललिता पोळ,मोनिका जाधव, सुवर्णा चीपाडे अनेक महिला मान्यवर उपस्थित होते. संस्थेचा वतीने राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.
लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. लिव्हर अन्न पचवण्यासोबतच पचनासाठी…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…