हळदी – कुंकू कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश
शिरूर (अरूणकुमार मोटे): संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करत असतात.यानिमित्त अनेक वेगवेगळे वान दिले जाते.तर्डोबाची वाडी येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले. यावेळी वान म्हणून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वछता खूप महत्वाची असते यासाठी महीलांना स्वछता किट देण्यात आले.त्यामध्ये सेनेटरी पॅड,मास्क, कोलगेट,ब्रश, डेटॉल, बेंडेज,डेटॉल साबण अशा वस्तू देण्यात आल्या.
स्वच्छतेचा संदेश यावेळी दिल्या मुळे खऱ्या अर्थाने ते वान ठरले. संक्रांती नंतर महिला महिनाभर हळदी कुंकू करण्यात व्यस्त असतात. वंचित घटकातील महिला मात्र अशा कार्यक्रमापासून लांबच राहतात . फारसे कोणी यांना सामावून घेताना दिसत नाही.त्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू साजरे केले. यानंतर त्यांना स्वच्छ्ता महत्व सांगितले. तसेच कोणतेही व्यसन करू नये.त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.तसेच मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्याचे आवाहन राणी कर्डिले यांनी केले.यावेळी सागर आव्हाड यांनी सहकार्य केले. यावेळी गीता आढाव,ललिता पोळ,मोनिका जाधव, सुवर्णा चीपाडे अनेक महिला मान्यवर उपस्थित होते. संस्थेचा वतीने राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…