हळदी – कुंकू कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश
शिरूर (अरूणकुमार मोटे): संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करत असतात.यानिमित्त अनेक वेगवेगळे वान दिले जाते.तर्डोबाची वाडी येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले. यावेळी वान म्हणून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वछता खूप महत्वाची असते यासाठी महीलांना स्वछता किट देण्यात आले.त्यामध्ये सेनेटरी पॅड,मास्क, कोलगेट,ब्रश, डेटॉल, बेंडेज,डेटॉल साबण अशा वस्तू देण्यात आल्या.
स्वच्छतेचा संदेश यावेळी दिल्या मुळे खऱ्या अर्थाने ते वान ठरले. संक्रांती नंतर महिला महिनाभर हळदी कुंकू करण्यात व्यस्त असतात. वंचित घटकातील महिला मात्र अशा कार्यक्रमापासून लांबच राहतात . फारसे कोणी यांना सामावून घेताना दिसत नाही.त्यामुळे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा – राणी कर्डिले यांनी समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू साजरे केले. यानंतर त्यांना स्वच्छ्ता महत्व सांगितले. तसेच कोणतेही व्यसन करू नये.त्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.तसेच मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवण्याचे आवाहन राणी कर्डिले यांनी केले.यावेळी सागर आव्हाड यांनी सहकार्य केले. यावेळी गीता आढाव,ललिता पोळ,मोनिका जाधव, सुवर्णा चीपाडे अनेक महिला मान्यवर उपस्थित होते. संस्थेचा वतीने राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…