शिरूर तालुका

युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळाचा रौप्यमहोत्सव उत्साहात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गोपाळ वस्ती येथील युवा गोपाळ तालीम गणेश मित्र मंडळ यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करून २५ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करत आहे. सन २००० मध्ये पैलवान नारायण पवार, राजेंद्र नाना पवार व कै. शिवाजीराव गव्हाणे यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेले हे मंडळ आज सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यात एक आदर्श ठरले आहे.

मंडळाचा अष्टविनायक राजा गणपती वर्षभर दर्शनासाठी उपलब्ध असून शिरूर, पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील भाविकांसाठी नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. या गणपतीचे आसन अष्टविनायकांनी सुशोभित असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदा मंडळाने तामिळनाडूतील लक्ष्मीनारायण सुवर्ण मंदिर, वेल्लोर याची प्रतिकृती साकारून भव्य देखावा उभारला आहे. भक्तांसाठी हा एक दिव्य व अद्वितीय अनुभव ठरतो आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून मंडळाने रक्तदान व आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, क्रीडा स्पर्धा, तालीम परंपरेचा प्रचार, स्वच्छता अभियान आणि संदेशमूल्यपूर्ण हलते देखावे या उपक्रमांतून समाजाशी नाते घट्ट केले आहे. विद्यमान अध्यक्ष निलेश दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली रौप्यमहोत्सवी पर्व उत्साहात पार पडत असून प्रकाशशेठ धारीवाल यांसह विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मंडळाला सतत लाभत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

4 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

4 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

4 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

4 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

6 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

6 तास ago