मुख्य बातम्या

आरोग्य केंद्रातील मुजोर डॉक्टरवर वरीष्ठांची कारवाई कधी? कारवाई न झाल्यास ग्रामस्थ करणार उपोषण

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या मुजोरीविरोधात आता ग्रामस्थांचा संताप प्रत्यक्ष कृतीतून प्रकट होऊ लागला आहे. नऊ ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे जिल्हा प्रशासनाला अंतिम इशारा दिल्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रासमोर पुढील आठवड्यात धरणे आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. या आरोग्य केंद्रातील डॉक्टरचे वडील उपजिल्हाधिकारी असून ते जिल्हाआरोग्य अधिकाऱ्यावर व इतरांवर दबाव आणत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन देसाई हे ठोसपने कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. देसाई आणि त्यांच्या वडिलांचे कॉल डिटेल्स तपासणीची मागणी आता पुढे आली आहे.या उपजिल्हाधिकाऱ्यांना बुलढाणा येथे दोन वर्षापुर्वी प्रकल्पग्रस्तांकडे १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहात पकडून अटक केले होते. आता हेच आधिकारी आपल्या अपत्यासाठी आधिकाराचा गैरवापर करून आरोग्य अधिकाऱ्यांना व इतरांना फोन करून अपत्याला वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे मुजोर डॉक्टर माझी कोणी वाकड करू शकत नाही व बदली करू शकत नाही हे ठामपणे खाजगीत बोलत आहे. त्यामुळे नऊ गावातील सामाजिक कार्यकर्ते यांनी हा लढा अधिक तीव्र करण्याचा चंग बांधला असून जोपर्यंत या डॉक्टरची बदली होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला आहे.

आरोग्य सेवेच्या नावाखाली नागरिकांना फसवणूक होत असून, डॉक्टर फक्त एक तास हजेरी लावून उर्वरित वेळ शिरूरमध्ये खासगी व्यवहार सांभाळत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहेत. यामुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव धोक्यात येतो.

नऊ गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, जर चार -पाच दिवसांत कारवाई झाली नाही तर आरोग्य केंद्राला कुलूप ठोकुन उपोषणाला बसणार आहे. दरम्यान, या प्रकरणात माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनीही लक्ष घालून जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही लेखी निवेदन दिले असून तेही या संबंधात आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. आता या भागातील आमदार दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी लक्ष घालून या डॉक्टरांची बदली होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

“जर सामान्य माणूस कसूर करत असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होते. मग या डॉक्टरांवर कारवाईसाठी प्रशासन कोणाची परवानगी घेत आहे? ग्रामीण जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्याला संरक्षण कोण देत आहे?” असा सवाल संतप्त ग्रामस्थ विचारत आहेत. टाकळी हाजी आरोग्य केंद्रातील या गोंधळावरून आता ग्रामस्थांचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास हे प्रकरण मोठ्या आंदोलनाच्या स्वरूपात उभे राहणार हे निश्चित झाले आहे. जिल्हा आरोग्य आधिकारी देसाई साहेब अजून किती रुग्णांचे तुम्ही कसाई होणार आहात? जर दवाखान्यात डॉक्टरच उपलब्ध नाही तर पेशंट वर कसे उपचार होणार ओ ? जर तुम्ही लवकरात लवकर दबाव झुगारून या डॉक्टरवर कारवाई न केल्यास या भागातील जनता तुम्हालाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे नक्की…

(क्रमशः)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

5 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

8 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

8 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

9 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

9 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

9 तास ago