पाबळ: विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई प्रशालेत नुकतीच गणेशोत्सव व्याख्यानमाला पार पडली. यावेळी आजार व कुटुंबापुढील समस्या या विषयावर व्याख्यान देताना सध्या जंक फूड मुळे मुलांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे.
मुलांची भूक मंदावत आहे व मुलांमध्येही आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांनाही हृदयविकाराचा झटका येत आहे . हे सर्व चुकीच्या आहाराचे परिणाम आहेत. तसेच स्टिंग सारख्या पेयांमुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळेभविष्यात मुले व्यसनाच्या आहारी जातील असे डॉक्टर नामदेव नरवडे यांनी प्रबोधन करताना सांगितले. कान्हूर मेसाई प्रशालेत दर वर्षी प्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या विषयांची व्याख्याने आयोजित केली जातात. यावेळी रमेश रोहोकले सर यांचे ‘आई मायेचा गाभारा’ व वर्षा पुंडे यांचे ‘आजचा विद्यार्थी, ज्ञानार्थी की परीक्षार्थी ‘या विषयावर व्याख्याने झाली.
यावेळी विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा अंजली घोलप, उपाध्यक्ष तानाजी खर्डे ,सचिव सदाशिव पुंडे ,सहसचिव बाळासाहेब पुंडे, संचालक दादासाहेब खर्डे, उद्योजक रोहिदास ढगे, संतोष घोलप, अनिल चौधरी, रतन तळोले, प्रदीप पुंडे, अमोल पुंडे, रमेश खर्डे , विलास तळोले , पोपटराव तळोले, अण्णा साकोरे, मुख्याध्यापक विनोद शिंदे ,पर्यवेक्षक मनोज धुमाळ, बाजीराव पुंडे , राजाराम दळवी, दत्तात्रेय खोडदे , शहाजी दळवी व प्रशालेतील सर्व शिक्षक व सर्व शिक्षकेतर वृंदआदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मछिंद्र राऊत यांनी केले. चंद्रकांत धुमाळ यांनी आभार मानले.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…