Categories: इतर

मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतून ऑलिंपिक विजेते घडावेत; अजित पवार

पुणे: महाराष्ट्रात बऱ्याच वर्षांनी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा यंदा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमधून भावी ऑलिंपिक पदक विजेते घडावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघटनेच्या बैठकीत व्यक्त केली.

महाराष्ट्रात यंदा राज्यस्तरावर विविध खेळांची मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धा संदर्भात संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनीही मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राचे कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी देशाला ऑलिंपिकमधील पहिले पदक मिळवून दिले. त्यांचा वारसदार घडवण्याची जबाबदारी राज्यातील सर्व क्रीडा संघटनांची आहे. प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेने क्रीडा प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यावर बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हरियाणा, पंजाब, ओडिशा इत्यादी राज्यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा नावलौकिक उंचावला आहे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आपल्या राज्यातील क्रीडा संघटने खेळाडूंच्या विकासावर अधिकाधिक भर दिला पाहिजे.

शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळेल याची मी ग्वाही देतो. मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत नैपुण्यशोध आणि विकास यावर भर दिला पाहिजे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, तालुका आणि क्रीडा स्तरावरील असलेल्या विविध क्रीडा संकुलांचा खेळाडूंना अधिकाधिक कसा फायदा होईल या दृष्टीने प्रत्येक खेळाच्या संघटनेने जबाबदारी उचलली पाहिजे.

शिरगावकर यांनी सांगितले, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनने आगामी 8 वर्षांच्या विविध क्रीडाविषयक योजनांचे नियोजन केले आहे. इसवी सन २०२८ व २०३२ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदके जिंकावीत या दृष्टीनेच आम्ही नैपुण्यशोध व विकास या अनुषंगाने काही योजना आखल्या आहेत.

आगामी मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही त्या दृष्टीनेच पायाभरणी असणार आहे. या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यांमधून नऊ हजार खेळाडू व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेला भावी ऑलिंपिकपटूंचा शोध घेणे सोपे होणार आहे. ही स्पर्धा दिमाखदार आणि संस्मरणीय व्हावी या दृष्टीनेच आमचे प्रयत्न राहतील. या स्पर्धेनिमित्त क्रीडा ज्योतीचे आयोजन केले जाणार असून प्रत्येक जिल्ह्यात या ज्योतीचा प्रवास असेल. त्यामुळे राज्यात क्रीडाविषयक सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे.

दिवसे यांनी सांगितले, खेळाडू हाच केंद्रबिंदू मानून राज्याचे क्रीडा संचालनालय काम करीत राहणार आहे. आगामी 3 वर्षांच्या क्रीडा स्पर्धा आणि त्या अनुषंगाने आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम याचा आराखडा आम्ही लवकरच निश्चित करणार आहोत.‌ प्रत्येक खेळाच्या राज्य संघटनेकडून प्रत्येक खेळाडू व प्रशिक्षक यांची सविस्तर माहिती आम्ही संकलित करणार आहोत. त्यामुळे खेळाडूची पार्श्वभूमी, त्याला आलेल्या अडीअडचणी इत्यादींचा अभ्यास आम्हाला करणे सोपे पडणार आहे. त्याचा फायदा त्याला विविध सुविधा देण्यासाठी निश्चितच होणार आहे. शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिल्यामुळे आता लवकरच या स्पर्धेचे कार्यक्रमपत्रिकाही निश्चित केली जाईल.

या बैठकीस महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे संलग्न क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. असोसिएशनचे खजिनदार धनंजय भोसले यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब लांडगे. उपाध्यक्ष संजय शेटे, निलेश जगताप, राजाराम राऊत, सहसचिव प्रकाश तुळपुळे व सुंदर अय्यर, तसेच अमित गायकवाड, पूर्णपत्रे, सोपान कटके, स्मिता यादव इत्यादी कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

3 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

3 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

3 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

3 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

3 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

5 तास ago