पाटणा: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, आता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे.
हवेली खडगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. याबाबत नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांनी दोघांचेही औपचारिक आणि कायदेशीर पद्धतीने लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेरमध्ये सोशल मीडियावर गेल्या 2 दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अज्ञात लोक एका जोडप्याचं जबरदस्तीनं लग्न लावताना दिसत आहेत.
खरगपूर तलावाला भेट देण्यासाठी एक जोडपं आलं होतं. लोकांनी यातील तरुणाचं लोकांनी बोट कापलं, त्यानंतर हे रक्त तरुणीच्या डोक्यात लावण्यास सांगितलं. तिथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ पाहून कुटुंबीयांनी बदनामीपासून वाचण्यासाठी दोघांचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी केली असता, हा व्हिडिओ हवेली खडगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खडगपूर तलावाजवळील असल्याचे समोर आले. हे प्रकरण आता चर्चेत आलं आहे. हा व्हिडिओ 21 ऑगस्टचा आहे. तरुण आणि तरुणी खरगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी गेले होते.
दोघांचं दोन महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या तरुणाचं नाव मिथलेश कुमार असं आहे. मिथलेश हा बरियारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहादूरपूर येथील रहिवासी महेश प्रसाद गुप्ता यांचा मुलगा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी प्रेमी युगुल तलावावर गेले होते. तिथे अज्ञात युवकांनी मुलीला आणि तरुणाला एका झुडपाजवळ बसवून त्यांची विचारपूस सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर आरोपींने खोटे आरोप करत आधी मुलाचे बोट दगडाने ठेचले आणि नंतर मुलीच्या भांगात कुंकू भरलं.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…