क्राईम

पुण्यातील धक्कादायला घटना, वेबसिरीज पाहून रचला हत्येचा कट…

पुणे: राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागच्या घटनांची आकडेवारी पाहिली तर पुण्यातही गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने एका तरुणाचा खून करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. ही घटना खराडी येथे घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण

खराडी येथे कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. अक्षय प्रकाश भिसे (वय 26) रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खुनाचा उलगडा झाला आहे. प्रेमात अडथळा ठरत असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे. संतोष सत्यवान शिंदे (वय 28) बिदर, कर्नाटक, मूळ रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर आणि संग्राम ऊर्फ बाबू राजू बामणे (रा. कान्हापुरी, पंढरपूर, सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने केली.

वेब सीरिज पाहून हत्येचा कट

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी सांगितले, की आरोपींनी आधी मोबाइलवर गुन्हेगारीशी संबंधित क्राइम वेब सिरीज, चित्रपट तसेच मालिका पाहिल्या होत्या. ते पाहूनच त्यांनी अक्षयच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आंध्र प्रदेश येथून पिस्तूलही खरेदी केले. पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा कसुन तपास करत आरोपींपर्यंत पोहोचत त्यांना अटक केली.

सीसीटीव्ही फुटेज तपासले 

अक्षय भिसे या खराडी येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा 21 ऑगस्टला खून करण्यात आला होता. सकाळच्या सुमारास तो कचरा वेचण्यासाठी गेला असता दोघांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या आणि त्याचा खून केला. याच प्रकरणाचा समांतर तपास चंदननगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाकडूनही सुरू होता. 21 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. अखेर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरुआहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

40 मिनिटे ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

1 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

2 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

2 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

6 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

6 तास ago