पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मन हेलावणारी अतिशय वाईट घटना घडली आहे. एका आईने आपल्या अवघ्या 6 महिन्याच्या बाळाला ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली चिरडून त्याचा मृत्यू होताना पाहिल. अतिशय वेदनादायक ही घटना आहे.
संबंधित घटना ही रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मृतक बाळाचे आई-वडील हे बाळाला घेवून दुकाचीकीवरुन जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मृतक बालकाची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्याचे आई-वडील त्याला रुग्णालयात घेऊन जात होते. आपल्या बालकाला रुग्णालयात घेवून जाण्याचा प्रवास हा त्याच्यासोबतचा शेवटचा प्रवास असेल अशी त्यांना कल्पनादेखील नसेल. पण दुर्देवाने अपघात घडला आणि होत्याचं नव्हतं झालं.
बालकाला रुग्णालयात घेवून जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने घात केला. खरंतर ती ट्रॅक्टर चालकाची चूक होती का पोलीस तपासाचा भार आहे. मृतक बालकाचे आई-वडील दुचाकीने रस्त्याने जात असताना त्यांनी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरला पुढे जाण्यासाठी जागा दिली. पण इथेच घात झाला. ट्रॅक्टर पुढे निघून गेला. पण त्याची ट्रॉली राहिली होती. ट्रॅक्टर पुढे जात असताना ट्रॉलीचा धक्का बसला आणि आईच्या हातून बाळ खाली पडलं. त्यानंतर ते बाळ थेट ट्रॉलीच्या चाकाच्या खाली चिरडलं गेलं. ही घटना इतकी वेगाने घडली की रस्त्यावरच्या कुणालाच काही समजलं नाही.
बाळाच्या अंगावरुन ट्रॅक्टरची ट्रॉली पुढे निघून गेल्यानंतर आईने रडत आपल्या लेकराला उचललं आणि त्याला कवटाळून छातीशी घेतलं. त्याला गोंजारण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्यांची दुचाकी खाली पडली होती. रस्त्यावर ये-जा करणारे नागरीक त्यांच्याकडे गेले. त्यांनी दाम्पत्याला बाळासह रस्त्याच्या बाजूला नेल्यावर बाळाला तातडीने रुग्णालयात नेलं पण बाळाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या दुर्घटनेनंतर ट्रॅक्टर चालकावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…