क्राईम

महीलेवर अत्याचार करुन तिच्या पतीची निर्घृण हत्या…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. गंगापूर तालुक्यात शेजारीच राहणाऱ्यांनी एका महिलेवर अत्याचार करत तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित महिलेलाही याबाबत कुठे वाच्च्यता केलीस तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. तब्बल 5 दिवसांनी महिलेने तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी रायभान थोरात, राहुल आघाडी, अनिल शिरसाट या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींनी 1 एप्रिलच्याा रात्री दीडच्या सुमारास महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी पीडितेच्या पतीला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या नंतर जखमी पतीला आरोपींनी थेट 45 फूट खोल विहिरीत टाकले. अर्ध्या तासानंतर त्याला पुन्हा वर काढून जीव जाईपर्यंत आरोपींनी मारहाण केली.

यादरम्यान, आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेला धमकी देत कोणालाही याबद्दल न सांगण्यास सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत महिलेने घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणात गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आठवडे बाजारातील चोऱ्यांना आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांची विशेष मोहीम

नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…

46 मिनिटे ago

महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे; उपाध्यक्षपदी सुनिल जिते यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…

2 तास ago

जास्त वेळ झोपल्याने शरीरावर काय होतो परिणाम

सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…

2 तास ago

रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…

2 तास ago

फडणवीसांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कार द्यावा; मोदी सरकारच्या दाव्यांवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…

2 तास ago

सामाजिक न्याय की राजकीय गणित? जाहिरातीतील एका चौकटीने पेटवला नवा वाद!

मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…

2 तास ago