औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. गंगापूर तालुक्यात शेजारीच राहणाऱ्यांनी एका महिलेवर अत्याचार करत तिच्या पतीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित महिलेलाही याबाबत कुठे वाच्च्यता केलीस तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने याबाबत कोणालाही माहिती दिली नाही. तब्बल 5 दिवसांनी महिलेने तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
गंगापूर पोलिसांनी याप्रकरणी रायभान थोरात, राहुल आघाडी, अनिल शिरसाट या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिन्ही आरोपींनी 1 एप्रिलच्याा रात्री दीडच्या सुमारास महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी पीडितेच्या पतीला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या नंतर जखमी पतीला आरोपींनी थेट 45 फूट खोल विहिरीत टाकले. अर्ध्या तासानंतर त्याला पुन्हा वर काढून जीव जाईपर्यंत आरोपींनी मारहाण केली.
यादरम्यान, आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. आरोपींनी या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेला धमकी देत कोणालाही याबद्दल न सांगण्यास सांगितले. मात्र पोलिसांच्या चौकशीत महिलेने घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणात गंगापूर पोलीस स्टेशन मध्ये तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…
मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…
शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…