महाराष्ट्र

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी

मुंबई: मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळून नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ही केवळ अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचाराचा परिणाम असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.

वडेट्टीवार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून मोशी कचरा डेपो परिसरातील बांधकाम परवानग्या, नियमांचे उल्लंघन आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे ६५ ते ७० फूट उंच कचऱ्याच्या ढिगाऱ्यापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर तीन मजली प्रशासकीय इमारतीला परवानगी देण्यात आली. पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ आणि घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ नुसार आवश्यक बफर झोन राखणे बंधनकारक असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून धोकादायक परिसरात बांधकाम व वापर परवानग्या देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना व बांधकाम परवानगी विभागातील संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार मोशी डेपो व वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) करण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करून कचऱ्याचे ढिगारे शास्त्रोक्त पद्धतीने कमी करावेत, आवश्यक बफर झोनची पुनर्स्थापना करावी आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

1 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

1 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

22 तास ago