महाराष्ट्र

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र प्रदेश NSUI चे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सात दिवसांत नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस, NSUI आणि समविचारी संघटनांसह राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत NSUI आणि युवक काँग्रेसने ‘जेन झी युनिव्हर्सिटी’च्या माध्यमातून शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रतीकात्मक गुणपत्रिका जाहीर करून राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील अपयशासाठी त्यांना “नापास” घोषित केले.

सागर साळुंखे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरल्याचा आरोप करत शिक्षकांवर बीएलओची अतिरिक्त कामे लादल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगितले. तसेच कॉलेज प्रवेश प्रक्रिया, बोगस नर्सिंग महाविद्यालये, आदिवासी विद्यार्थ्यांची कथित फसवणूक आणि विविध शुल्कांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनीही सरकारवर टीका करत, पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असताना सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होत असताना “थँक्यू मोदी” अभियान कशासाठी, असा सवाल करत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत NSUI चे प्रदेश महासचिव ऋषीकेश खंडाळे यांनी शिक्षण विभागातील कथित अनियमिततांवर सादरीकरण केले. दक्षिण मध्य मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा प्रज्ञा ढवळे याही यावेळी उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

1 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

1 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

22 तास ago