पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी हेमलता बाळासाहेब मगर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादींची मुलगी दीप्ती हिचा विवाह रोहन कारभारी याच्याशी झाला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच दीप्तीला सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी त्रास दिला जाऊ लागला.
चारचाकी वाहनासाठी पैशांची मागणी
तक्रारीनुसार, दीप्तीकडे माहेरून चारचाकी वाहन घेण्यासाठी सतत पैशांची मागणी केली जात होती. २५ डिसेंबर २०१९ पासून २४ जानेवारी २०२६ या कालावधीत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दीप्ती पूर्णपणे कोलमडून गेली होती.
जबरदस्तीच्या गर्भपाताचा धक्कादायक आरोप
या प्रकरणात आणखी एक अत्यंत गंभीर बाब समोर आली असून, दीप्तीला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दीप्ती गर्भवती असल्याची माहिती समजल्यानंतर सुरुवातीला सर्वांनी आनंद व्यक्त केला होता. मात्र नंतर तिला मूल नको असल्याचे सांगत, तिच्यावर दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
राहत्या घरी गळफास
सततच्या छळाला कंटाळून अखेर दीप्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि दिराविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दीप्तीला न्याय कधी मिळणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…