क्राईम

कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एक कुटुंब लग्नासाठी बाहेरगावी गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील फडतरे वस्ती येथे राहणारे उत्तम भोकरे हे घराला कुलूप लावून त्यांच्या कुटुंबियांसह बारामती येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेलेले होते. सकाळच्या सुमारास शेजारील नागरिक उठले असता भोकरे यांच्या घराचे कुलूप तुटलेले व घरातील लाईट सुरु असल्याचे दिसले त्यामुळे शेजारच्यांनी याबाबतची माहिती भोकरे यांना दिली.

दरम्यान भोकरे यांनी घरी येत घरातील पाहणी केली असता सर्व साहित्य अस्ताव्यस्थ पडलेले तसेच कपाट उघडे दिसुन आले. त्यामुळे पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील तीन तोळे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा अंदाजे 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे दिसून आले.

याबाबत उत्तम केरु भोकरे (वय ६५) रा. फडतरे वस्ती कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

15 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

15 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

15 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

15 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

17 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

17 तास ago