शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर एस.टी. बसस्थानकावर रविवार (दि .११) रोजी दुपारी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत ही चोरी झाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्रिमूर्ती नगर, बारामती येथे राहणाऱ्या रूपाली अनिल काळेल या आपल्या मुलगी तन्वी व भाची साक्षीसह मलठण येथील नातेवाइकाच्या लग्नानंतर बारामतीकडे परत येत होत्या. शिरूर बसस्थानकावर त्यांनी फलाटावर उभी असलेल्या चौफुल्याकडे जाणाऱ्या एसटीमध्ये (क्र. एमएच १४ बीटी ४१९३) प्रवेश केला. काही वेळाने त्यांनी पर्स तपासली असता, साडेसहा तोळे गंठण व दीड तोळ्याच्या कर्णफुलांचा अत्ता नसलेला प्रकार लक्षात आला.
दागिने दिसून न आल्याने श्रीमती काळेल यांनी तातडीने वाहकाला बस थांबवण्यास सांगितले. बसमधील प्रवाशांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी आपले बंधू प्रशांत गिते यांना संपर्क साधला. थोड्याच वेळात त्यांच्यासह पोलिसही बसस्थानकावर दाखल झाले.
श्रीमती काळेल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पर्समध्ये ठेवलेले ३,९०,००० रुपयांचे गंठण व ७८,००० रुपयांच्या कर्णफुलांचा समावेश होता. एकूण ४,६८,००० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप तपास करत आहेत.
शिरूर बसस्थानकावर टोळी सक्रिय
या चोरीच्या प्रकारामुळे पुन्हा एकदा शिरूर बसस्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही बसस्थानकावर दागिने चोरी, खिसेकापू व पाकिटमारीच्या घटना घडल्या असून, परजिल्ह्यातील टोळी बसस्थानकावर लक्ष ठेवून असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. महिला व लहान मुलांच्या साहाय्याने गर्दीत चोरी करून दुसऱ्या बसने पलायन करण्याची पद्धत या टोळीची असल्याचेही समजते.
पोलिसांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, काही संशयितांबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
शिरूर बसस्थानक हे पुणे, अहिल्यानगर, विदर्भ व मराठवाड्याशी जोडणारे प्रमुख केंद्र असून येथे कायमची वर्दळ असते. मात्र, येथे कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्त नसल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. होमगार्ड चंदाबाई चव्हाण यांचा बसस्थानकावर दबदबा असला तरी, त्यांच्या सोबत एक-दोन पोलिसही कायमस्वरूपी नेमावेत, अशी मागणी शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी केली आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…