क्राईम

कॅन्सरग्रस्त आजीकडून नात-नातजावयाने केले पाच लाख रुपये लंपास अन्…

पैशांवरून उलट दिली ठार मारण्याची धमकी; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील इंदिरानगरमध्ये मानवी नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरग्रस्त आजीकडे भेटायला आलेल्या नाती-नातजावयानेच तिच्या घरातील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कमल दत्तू मलगुंडे (वय ६०, रा. इंदिरानगर, शिरूर पेट्रोलपंप शेजारी) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

आरोप राजु दिनकर कोळपे व शिवानी राजु कोळपे (दोघे रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेअडीच वाजता शिवानी व तिचा पती राजु कोळपे आजारी आजीला भेटायला आले.आजी बेडवर विश्रांती घेत असताना घरातील कपाटातून ५ लाख रुपयांची रोकड चोरी करून दोघे निघून गेले.भेटीदरम्यान निवांत बोलणे, चहा घेणे यामागे चोरी लपवण्याचा डाव.होता

दुसऱ्या दिवशी नगरला उपचाराकरिता जाण्यापूर्वी फिर्यादींनी कपाट तपासले असता रोकड गायब असल्याचे आढळले.फिर्यादींनी नात-नातजावयास फोन करून पैसे विचारले असता “तुझ्याकडे काय पुरावा आहे? तुझे पैसे घेतले नाहीत. उलट तुझ्याकडे आमचे आठ लाख रुपये आहेत. पुन्हा पैसे मागितलेस तर ठार मारू,”अशी धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात चोरी व धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नाथासाहेब जगताप करत आहेत.bकॅन्सरग्रस्त आजीकडून पाच लाख रुपयांची चोरी केल्याचीफिर्याद दाखल केल्याने नाती व नातजावईवर विश्वासघाताचा डाग पडला आहे. ही घटना शिरूर परिसरात मोठ्या चर्चेचा विषय ठरत असून, “आपलेपणाचा विश्वास तोडणारे हे कृत्य” असे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

9 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

9 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

10 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

10 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago