क्राईम

शिक्रापूरच्या वाबळेवाडीत जमिनीच्या वादातून हाणामारी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर गवारे, दादा ज्ञानेश्वर गवारे, आशा ज्ञानेश्वर गवारे, सुभाष जयवंत वाबळे, अजित सुभाष वाबळे यांच्यासह दोन अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी येथे अजित वाबळे व आशाबाई गवारे यांची एकत्रित जमीन सडून सदर जमिनीत बांधकाम करण्याहून त्यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. दरम्यान याबाबत अजित सुभाष वाबळे (वय २८) रा. वाबळेवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे व आशाबाई ज्ञानेश्वर गवारे (वय ५०) रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या.

शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर गवारे, दादा ज्ञानेश्वर गवारे, आशा ज्ञानेश्वर गवारे व 2 अनोळखी व्यक्ती सर्व रा. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) जि. पुणे तसेच सुभाष जयवंत वाबळे, अजित सुभाष वाबळे दोघे रा. वाबळेवाडी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

7 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

7 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

8 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

13 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

13 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

13 तास ago