रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.
याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रांजणगाव येथील गट नंबर ११३२ मधील जेसीबी व ट्रॅक्टरचे काम थांबवण्यासाठी ते घटनास्थळी गेले असता, आरोपी शेळके (पूर्ण नाव माहिती नाही) व सचिन शांताराम शेलार (रा. रांजणगाव) या दोघांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला असुन या घटनेचा तपास पोलीस हवालदार अनिल चव्हाण करीत आहेत.
तर याच शेतजमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत सचिन शांताराम शेलार (वय ४४, रा. रांजणगाव गणपती) यांना दमदाटी करत हातातील लाकडी बॅटने दत्तात्रय परशुराम शेलार यांनीही दि १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० च्या सुमारास डोक्यात व पाठीवर मारहाण केली असल्याची परस्परविरोधी तक्रार सचिन शेलार यांनी रांजणगाव पोलिस स्टेशन येथे केली आहे.
याबाबत सचिन शांताराम शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते आपल्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणी असताना आरोपी दत्तात्रय परशुराम शेलार (रा. रांजणगाव, ता. शिरूर) हा तेथे आला. त्याने “ही जागा माझी आहे” असे सांगून फिर्यादीला शिवीगाळ केली तसेच दमदाटी करून हातातील लाकडी बॅटने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर मारहाण केली.
या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. मारहाणीमुळे सचिन शेलार यांना दुखापत झाली असून त्यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन पुढील तपास पोलीस हवालदार अजित पवार हे करत आहेत. या घटनेनंतर एका फिर्यादीने दिलेल्या जबाबात एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याच्या भावाचे नाव घेतलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…