मुख्य बातम्या

सविंदणे ग्रामपंचायतीत महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा, मालुबाई मिंडे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे ग्रामपंचायतीत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत महिलांनी पुन्हा एकदा नेतृत्वाचे वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी उपसरपंच गोरक्ष लंघे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी मालुबाई नामदेव मिंडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेत सरपंच मनीषा नरवडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी आरती गव्हाणे यांनी प्रभावी काम पाहिले. विशेष म्हणजे, सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी ही तिन्ही महत्वाची पदे महिलांच्या हाती गेल्याने सविंदणे ग्रामपंचायत महिला नेतृत्वाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

गावकऱ्यांमध्ये या निवडीबद्दल प्रचंड उत्साहाचे वातावरण असून, महिला सक्षमीकरणाचा नवा टप्पा गाठल्याचा अभिमान नागरिक व्यक्त करत आहेत. ग्रामपंचायतीतील महिला सदस्य व ग्रामस्थांनी मालुबाई मिंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मालुबाई मिंडे यांच्या निवडीबद्दल माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, भाजी आमदार पोपटराव गावडे, माजी पं.स. सदस्य डॉ. सुभाष पोकळे यांनी दूरध्वनीद्वारे व संदेशाद्वारे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. “गावातील विकासकामांना नवे बळ मिळेल आणि महिलांच्या नेतृत्वातून गावाचा सर्वांगीण विकास साध्य होईल” असा विश्वास या मान्यवरांनी व्यक्त केला.

सविंदणे ग्रामपंचायतीत महिलांच्या हाती सत्ता आल्याने गावात नवा आदर्श निर्माण झाला आहे. गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, महिला-बालविकास यांसह मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष केंद्रित होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. महिला सदस्यांच्या नेतृत्वामुळे गावाच्या प्रगतीत सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीतील नागरिकांनी मांडली.

गावातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, “आजवर पुरुषवर्गाचे नेतृत्व आपण पाहिले, मात्र आता स्त्रियांच्या हातात सत्ता येत असल्याने गावच्या विकासाला नवा चेहरा मिळेल.” निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याने गावात एकी व सलोखा टिकून असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

4 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

4 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

4 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

4 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

4 तास ago