क्राईम

अमली पदार्थ प्रकरणातील संशयितांना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला

तलवार, चॉपर, हॉकी स्टिक, गावठी कट्ट्याने हल्ला; चार जण जखमी

मुंबई: अमली पदार्थ खरेदी-विक्री प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकावर आठ जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उलवा परिसरात घडली आहे. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री उलवा सेक्टर १९ येथील शगुन चौक परिसरात संशयित आरोपींच्या शोधात मुंबई पोलिसांचे पथक दाखल झाले होते. यावेळी काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथक पुढे सरसावले असता, संशयितांनी अचानक पोलिसांवर हल्ला चढवला.

तलवार, चॉपर, फायटर पंचचा वापर

हल्लेखोरांकडे चॉपर, तलवार, हॉकी स्टिक, फायटर पंच तसेच एका आरोपीकडे गावठी कट्टा आढळून आला आहे. या हल्ल्यात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांच्यासह पोलीस मित्र फिरोज सिद्दीकी, अहमद रजा कुरेशी आणि अतुल जैस्वाल हे जखमी झाले आहेत.

संशयित आरोपींची नावे

या प्रकरणी शाहिद खान, आयाज खान, आसिफ खान, इस्माईल शेख, मेहराज खान यांच्यासह आठ जणांविरोधात उलवे पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

स्थानिक पोलिसांची माहिती न दिल्याने प्रश्नचिन्ह

विशेष बाब म्हणजे, मुंबई पोलिसांच्या पथकाने कारवाईपूर्वी स्थानिक उलवा पोलिसांना माहिती दिली नव्हती. स्थानिक पोलिसांची मदत न घेता कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, हल्लेखोरांना समोर असलेले पथक पोलीस असल्याची माहिती नसल्याने त्यांनी हल्ला केल्याचा दावा पोलीस सूत्रांकडून करण्यात आला आहे.घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

11 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

11 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

11 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

15 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

16 तास ago