मनोरंजन

स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नवा प्रोमो ठरतोय चर्चेचा विषय

मुंबई: स्टार प्रवाहवरील सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे ‘लग्नानंतर होईलच प्रेम’. मालिकेतील सध्याचे ट्रॅक प्रेक्षकांना प्रचंड भावत असून जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी यांच्यातील नातेसंबंधांमध्ये नवनवीन वळणं येताना पाहायला मिळत आहेत.

मालिकेत जीवा आणि काव्या आपल्या भूतकाळातील सत्य उघड झाल्यानंतर पार्थ आणि नंदिनीला पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, या दरम्यान जीवा नंदिनीच्या तर काव्या पार्थच्या प्रेमात पडलेले दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे दोघांनीही आपापल्या खऱ्या जोडीदाराचं मन पुन्हा जिंकण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. प्रोमोमध्ये काव्या जीवाला समजावताना दिसते. ती म्हणते की, “लवकरच गैरसमजांची धूळ पुसली जाईल आणि नंदिनी ताईंना तुझं आणि पार्थला माझं लग्नानंतरचं प्रेम दिसेल.” हे संभाषण पार्थ ऐकतो आणि तो तात्काळ नंदिनीला भेटायला जातो.

पार्थ नंदिनीला सांगतो, “आज मी जीवा आणि काव्याला छान मित्रासारखं बोलताना पाहिलं. ते लग्नापूर्वीचा भूतकाळ विसरून आपल्यासाठी पुढे आले आहेत. आता आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं.” पार्थचे हे शब्द ऐकून नंदिनी आनंदी होते.

हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आता दोन्ही जोड्यांची लव्हस्टोरी दाखवा,” “रम्या आणि आत्या यांना बाजूला सारून दोन्ही जोड्या एकत्र आणा,” अशा कमेंट्स चाहत्यांकडून केल्या जात आहेत.दरम्यान, रम्या आता काही नवीन कारस्थान रचणार का? मालिकेत आणखी कोणता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहत राहा ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, दररोज संध्याकाळी ७ वाजता, फक्त स्टार प्रवाहवर.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंढे यांची भूमिका; "एफडीएची लॅब ही २४ तास कार्यरत आणीबाणीची सेवा" मुंबई…

57 मिनिटे ago

दिल्लीत सचिन अहिर यांची केंद्रीय मंत्र्यांशी बैठक; मुंबईच्या पुनर्विकास, रेल्वे आणि मिठागरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा,…

1 तास ago

शेणातून होणार लाखोंची कमाई! सरकार खरेदी करणार बायोगॅस; ‘गोवर्धन’ योजनेला 23,731 कोटींची मंजुरी

नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची…

1 तास ago

शरद पवारांचा मोठा संघटनात्मक निर्णय; राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांची नियुक्ती रद्द

15-16 ऑगस्टला जिल्हाध्यक्षांची बैठक; लवकरच नव्या प्रवक्त्यांसह संघटनात्मक फेरबदलांची घोषणा मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र…

1 तास ago

गैरसमज दूर होईल; मनोज जरांगेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

जात प्रमाणपत्र रद्द, मराठा आरक्षण आणि गद्दारीच्या आरोपांवरून शिंदे-जरांगे आमनेसामने; निवडणुकीत आमदार पाडण्याचा जरांगेंचा इशारा…

1 तास ago

जात प्रमाणपत्र वैध करा, अन्यथा सरकार पाडू; मनोज जरांगे यांचा फडणवीस-शिंदेंना इशारा

चार लोकप्रतिनिधींची अंतरवाली सराटीत जरांगे यांची भेट; एकनाथ शिंदेंवर 'डबल ढोलकी' वाजवण्याचा आरोप, बावनकुळे यांच्यावरही…

1 तास ago