शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये सन २०२२ या कालावधीमध्ये टाकळीहाजी, रावडेवाडी, आमदाबाद व बेट भाग तसेच गोलेगाव, इनामगाव या परीसरासह शिरूर तालुक्यातुन विद्युत शेतीपंपांची (पाणी उपसा मोटारींची) मोठया प्रमाणावर चोऱ्या झाल्या होत्या. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे दाखल झाले होते.
इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे चोरांचा शोध घेण्याकरता शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांनी पोलीस ठाणे तपास पथक व टाकळीहाजी पोलीस चौकीचे अधिकारी अंमलदार यांना सांगुन त्याप्रमाणे तपास पथकाने चोरांचा कसून शोध घेवून सदर इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे आरोपी व्यक्ती नामे १) पांडुरंग शिवाजी बोडरे (वय २1) २) मोन्या उर्फ कुलदिप बबन बोडरे (वय २२) दोघे रा. रावडेवाडी (ता. शिरूर) जि. पुणे यांना पकडुन त्यांचेकडुन सुमारे १६ इलेक्ट्रीक पाणी उपसा मोटारी जप्त करण्यात आल्या होते. व त्यांना ९ गुन्हयात अटक करून कोर्टात हजर केले होते.
त्याची अंकीत गोयल पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी गंभीर दखल घेवुन सदर आरोपीतांना १ वर्षाकरीता पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड शहर व पुणे शहर हददीसह अहमदनगर जिल्हयातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यांतुन (दि. २७) एप्रिल पासून तडीपार करण्यात आले आहे व यापुढील कालावधीतही शेतक-यांचे इलेक्ट्रीक मोटार व केबल चोरी करणा-यांवर अशाच प्रकारे कठोर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.
वरील आरोपीतांवर ठोस प्रतिबंधक कार्यवाही करून तडीपार करणेकामी यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग व सुरेशकुमार राउत पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली, अमोल पन्हाळकर सहा पोलीस निरीक्षक, एकनाथ पाटील पोलीस उपनिरीक्षक, सुनिल उगलेपोलीस उपनिरीक्षक, अभिजित पवार पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार परशराम सांगळे यांनी कामकाज पाहीले आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…