न्हावरे (तेजस फडके): मोटेवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी संदीप दौलत येलभर यांच्या गट क्र. ६८६ मधून १,४०० किलो डाळिंब (किंमत अंदाजे १ लाख ४० हजार) चोरीला गेले होते. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश करुन शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सदर प्रकरणात आरोपी असणाऱ्या भामट्याला शिरुर पोलिसांनी अटक केली आहे.
दि ७ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ८ जुलै पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तीने डाळिंबाची चोरी केली होती. परंतु शेतकरी संदीप येलभर यांना पहाटे अचानक जाग आल्यावर त्यांनी शेतात फेरफटका मारला असता अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी क्रं एम एच १२-वाई ई ४०२३ जाग्यावरच सोडुन पळ काढला होता. याबाबत संदीप येलभर यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे संशयित वाहनाचा तपास लावला. सदर गाडी ही आकाश बशीर काळे (रा. सोनसांगवी) याच्याच मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
दि १४ जुलै रोजी आरोपी आकाश काळे हा रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित कारवाई करत त्याला सापळा रचून अटक केली. पोलिस तपासादरम्यान आकाश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता दि १६ जुलै २०२५ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हि यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड व अजय पाटील यांनी केली आहे.
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…
नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…
रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…