न्हावरे (तेजस फडके): मोटेवाडी (ता. शिरुर) येथील शेतकरी संदीप दौलत येलभर यांच्या गट क्र. ६८६ मधून १,४०० किलो डाळिंब (किंमत अंदाजे १ लाख ४० हजार) चोरीला गेले होते. या प्रकरणात शेतकऱ्यांच्या घामाच्या कमाईवर डोळा ठेवणाऱ्या चोरट्याचा पर्दाफाश करुन शिरुर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सदर प्रकरणात आरोपी असणाऱ्या भामट्याला शिरुर पोलिसांनी अटक केली आहे.
दि ७ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ८ जुलै पहाटे दरम्यान अज्ञात व्यक्तीने डाळिंबाची चोरी केली होती. परंतु शेतकरी संदीप येलभर यांना पहाटे अचानक जाग आल्यावर त्यांनी शेतात फेरफटका मारला असता अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी क्रं एम एच १२-वाई ई ४०२३ जाग्यावरच सोडुन पळ काढला होता. याबाबत संदीप येलभर यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे संशयित वाहनाचा तपास लावला. सदर गाडी ही आकाश बशीर काळे (रा. सोनसांगवी) याच्याच मालकीची असल्याचे निष्पन्न झाले.
दि १४ जुलै रोजी आरोपी आकाश काळे हा रांजणगाव परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने त्वरित कारवाई करत त्याला सापळा रचून अटक केली. पोलिस तपासादरम्यान आकाश काळे याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला शिरुर न्यायालयात हजर केले असता दि १६ जुलै २०२५ पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हि यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड व अजय पाटील यांनी केली आहे.
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…
शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…
शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…