महाराष्ट्र

दिग्गज अभिनेते-निर्माते धीरज कुमार यांचं निधन

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक धीरज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनियाची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होती आणि ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते. अखेर आज (15 जुलै) त्यांची प्राणज्योत मालवली. धीरज कुमार यांनी 1965 मध्ये कलाविश्वात पाऊल ठेवलं होतं. सुभाई घई आणि राजेश खन्ना यांच्यासोबत ते एका टॅलेंट शोच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते. या शोचे विजेते राजेश खन्ना ठरले होते.

1970 ते 1984 च्या दरम्यान त्यांनी 21 पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. धीरज कुमार यांनी ‘हिरा पन्ना’, ‘रातों के राजा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. त्यांनी 1970 आणि 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आपला ठसा उमटवला. त्या काळातील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. ‘रोटी कपडा और मकान’ (1974) या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका साकारली होती. यामध्ये त्यांनी मनोज कुमार आणि झीनत अमान यांच्यासोबत स्क्रीन शेअर केला होता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं होतं. धीरज यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ नावाने निर्मिती कंपनीची स्थापना केली आणि तेच या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या कंपनीच्या बॅनरअंतर्गत ‘ओम नम: शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘जय संतोषी माँ’ आणि ‘जप तप व्रत’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांची निर्मिती झाली. या मालिका त्यांच्या कथानकामुळे आणि अध्यात्मिक थीममुळे चर्चेत आल्या होत्या.

काही दिवसांपूर्वीच ते नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी झाले होते. सनातन धर्माच्या प्रसाराला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांचं कौतुक केलं होतं. “मी इथं नम्रतेच्या भावनेनं आलो आहे. जरी ते मला व्हीव्हीआयपी म्हणत असले तरी खरा व्हीव्हीआयपी इथे देव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्कॉन मंदिराच्या भव्यतेबद्दल आणि महत्त्वाबद्दल सांगितलं आणि त्यांचे शब्द नेहमीच प्रेरणादायी असतात. इथल्या लोकांचं प्रेम आणि आपुलकी मला खूप भावली आहे. ‘राधे राधे कृष्ण कृष्ण’ या शब्दांचं अध्यात्मिक महत्त्व खूप आहे. या मंदिराला भेट देऊन मला खूप मानसिक शांतता जाणवली”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

12 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

17 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

17 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

17 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

17 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

19 तास ago